रमजानचे उपवास म्हणजे
चित्तशुद्धीची पर्वणीच...

रमजानचे उपवास म्हणजे चित्तशुद्धीची पर्वणीच...

पवित्र कुराणच्या आज्ञेप्रमाणे इस्लाम धर्माची इमारत, मुख्य पाच तत्त्वावर उभी आहे. हे सर्व पाचही स्तंभ अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहिले तत्त्व आहे ‘अद्वैत’ म्हणजे र्इश्वर एकच आहे. जगातील जवळजवळ सर्वच धर्मांनी हे तत्त्व मान्य केले आहे. इस्लामचे दुसरे तत्त्व म्हणजे ‘प्रार्थना’, याला ‘नमाज’ किंवा ‘सलात’ असे म्हणतात. हे तत्त्व सर्वच धर्मात असते. फक्त विविध धर्मांत प्रार्थना किंवा उपासना पद्धती भिन्न असते. तिसरे तत्त्व म्हणजे ‘उपवास’, याला इस्लाममध्ये रमजानचे ‘रोजे’ असे म्हणतात. सर्वच धर्मात उपवास सांगितले आहेत. जैन धर्मात तर ‘पर्युषण पर्व’ असते. चौथे तत्त्व म्हणजे ‘दानधर्म’, याला इस्लाम धर्मात ‘जकात’ असे म्हणतात. आपल्या एकूण मिळकतीमध्ये गरीब माणसांचाही वाटा असतो, अशी या पाठीमागची भूमिका आहे. पाचवे तत्त्व म्हणजे ‘मक्केची यात्रा’, याला ‘हाज’ असे म्हणतात. प्रत्येक धर्मात तीर्थक्षेत्र यात्रा सांगितली आहे. हिंदू धर्मात काशीच्या (वाराणसी) यात्रेला व चारधाम यात्रेला फार महत्त्व आहे. थोडक्यात, सर्वच धर्माची मुख्य तत्त्वे समानच आहेत. केवळ भक्ती (इबादत) करून जास्तीत जास्त पुण्य लाटण्याचा हा महिना तर आहेच, परंतु त्याचबरोबर, स्वतः उपवास ठेऊन इतरांची भूक आणि तहान याची जाणीव करून घेण्याचा हा महिना आहे.
रमजानच्या महिन्यात उपवासाद्वारे माणसाची सहनशक्ती व संयम यांची वृद्धी होते व माणसामध्ये असलेले राग, लोभ, मद, मोह, मत्सर आणि विकृती यांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याग करण्याची मानसिकता उपवासामुळे माणसामध्ये निर्माण होते म्हणून रमजानचे उपवास म्हणजे माणसाच्या आत्मशुद्धी किंवा चित्तशुद्धीची पर्वणीच म्हणावी लागेल.

(लेखक, माजी कुलगुरू नागपूर विद्यापीठ)

इफ्तार ः ६.५५ (शनिवार सायंकाळी)
सहेरी ः ५.१५ (रविवार सकाळी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com