जिल्ह्यात अद्याप एकही
टँकर सुरू नाही

जिल्ह्यात अद्याप एकही टँकर सुरू नाही

पुणे, ता. २९ : गत वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे मार्च महिना संपत आला तरी देखील जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज पडलेली नाही. दरवर्षी मार्चच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील काही तालुक्यांत पाणीटंचाई जाणू लागते. त्यामुळे त्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. मात्र, यंदाचे वर्ष त्याला अपवाद ठरले आहे.

गेल्या वर्षी २५ एप्रिल रोजी जिल्ह्यातून प्रथमत: टँकरची मागणी आली होती. आंबेगावमधील सात गावे, जुन्नरमधील तीन, खेडमधील पाच आणि शिरूरमधील तीन, अशा एकूण १८ गावांतील ४८ हजार ९९१ बाधित नागरिकांना नऊ शासकीय आणि १६ खासगी अशा २५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता, असेही विभागीय आयुक्तालयाकडून सांगण्यात आले. यंदा मात्र मार्च महिना संपत आल्यानंतरही जिल्ह्यातून टँकरची मागणी सुरू झालेली नाही.
पुणे जिल्ह्यात २६ धरणे आहेत. या सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या वर्षी दमदार पाऊस झाला. त्यामुळे सर्वच धरणे शंभर टक्के भरली होती. त्यामुळे यंदा मार्चअखेरीसही जिल्ह्यात अद्याप एकही टँकर सुरू झालेला नाही, असे विभागीय आयुक्तालयाकडून सांगण्यात आले. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील तब्बल १२ धरणांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक आहे, तर उर्वरित धरणांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाणीसाठा शिल्लक आहे. अद्यापही एकही धरणाने तळ गाठलेला नाही, असे जलसंपदा विभागाकडून स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com