शेती, संरक्षण क्षेत्रातच खरी मूल्यनिर्मिती होईल सुरक्षा विषयक तज्ज्ञ डॉ. अंकित शाह यांचे मत
पुणे, ता. २७ ः ‘‘चलन व्यवस्थेतील बदलांमुळे येत्या पाच वर्षांत शेती, उत्पादन, लॉजिस्टिक्स, संरक्षण आणि अवकाश क्षेत्रातच खरी मूल्यनिर्मिती होईल आणि नव्या पदवीधरांना अवास्तव वेतन देणारे तथाकथित ‘फेक जॉब्स’ लवकरच संपुष्टात येतील,’’ असे मत परराष्ट्र धोरण व सुरक्षा विषयातील तज्ज्ञ डॉ. अंकित शाह यांनी व्यक्त केले.
नेशन फर्स्ट आणि चाणक्य मंडळ परिवार यांच्यातर्फे हडपसर येथे आयोजित ‘डिग्लोबलायझेशन अँड इमर्जन्स ऑफ सनातन इकॉनॉमिक्स मॉडेल’ या चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी, नेशन फर्स्टच्या संयुक्ता भोसले आदी उपस्थित होते.
डॉ. शाह म्हणाले, ‘‘भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या मुख्य क्षेत्रांकडून लक्ष हटविण्यासाठी माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राला जाणूनबुजून अतिरंजक करण्यात आले. ई-कॉमर्समध्ये डॉलरची मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून लघु व्यापारी व स्थानिक उद्योजकांचे उत्पन्न कमी करण्याचा डाव रचला गेला. त्यामुळे आता डी-डॉलरायझेशन आणि डिग्लोबलायझेशनच्या युगात परकी निधीवर चालणारे अनेक स्टार्टअप्स बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला शेती, उत्पादन, खाद्य प्रक्रिया, लॉजिस्टिक्स, संरक्षण आणि अवकाश या मूळ क्षेत्रांकडे परतण्याची तयारी ठेवावी.’’
अब्राह्मिक अर्थशास्त्र केवळ एक जन्म मानून भौतिक सुखभोगावर केंद्रित असते, तर सनातन इकॉनॉमिक्स हे कर्म-फल सिद्धांतावर आधारित असून, निसर्गचक्रातील संतुलन राखण्यावर भर देते, असेही शहा यांनी सांगितले, तर आपण जे काही घेतो, ते परत देण्याची जबाबदारी आपली आहे, कारण आपण पुन्हा या पृथ्वीवर येणार असल्याचे मत धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
----------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

