माणसावर तंत्रज्ञानाचा ताबा ः सौरभ भोसले

माणसावर तंत्रज्ञानाचा ताबा ः सौरभ भोसले

सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आपल्यातील ऊर्जा मोठ्या प्रमाणात वाया जात आहे. सोशल मीडियात प्रत्येकाचा सरासरी चार तासांपेक्षा जास्त वेळ जात आहे. अनेक ट्रेंड बळजबरीने आपण फॉलो करतो आहोत. त्यातून आपण परस्परविरोधी वागतो. तंत्रज्ञानाने प्रत्येकाला ताब्यात घेतले असल्याचे मत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सौरभ भोसले यांनी व्यक्त केले.
भोसले म्हणाले, ‘‘सोशल मीडियामुळे आपण अनेक चुकीच्या गोष्टी करत आहोत. आपल्या भावना आपण त्यातून दुसऱ्यांना देत आहोत, ते पहिल्यांदा बंद करायला हवे. आपण माहिती मागत नाही तीच तो देतो. त्यानंतर आपण तुलना करायला सुरुवात केली. आपण त्यानुसार जगायला लागतो आणि खर्च करायला लागतो.’’

भोसले म्हणाले...
- माणूस आयुष्यात स्वतःबद्दल जास्त विचार करत नाही
- संवादाचा पहिला नियम तुम्ही आधी बोलले पाहिजे.
- अनेक जण सोशल मीडियामध्ये वेगळे आणि प्रत्यक्ष आयुष्यात वेगळे वागतात
- एखादी गोष्ट पाहताना ती का बघतो, याचा आधी विचार करा
- घरात आपल्या मताला महत्त्व येत असेल तर माणूस म्हणून आपण चांगले
- जुन्या पिढीने शाश्वत वाढ बघितली म्हणून ते टिकून आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com