वाहतूक बदलामुळे पाऊण तासाची बचत

Hinjewadi
Hinjewadi

पिंपरी - हिंजवडीमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांनी वाहतुकीमध्ये बदल केले. याचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे. चार लाख आयटीयन्सचा सकाळ व सायंकाळच्या प्रवासातील पाऊण तास वाचत आहे.

हिंजवडीतील वाहतूक कोंडीमुळे आयटीयन्स हैराण झाले होते. यामुळे काही कंपन्या हिंजवडीतून स्थलांतर करणार असल्याची चर्चा सुरू होती. या चर्चेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली. येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी स्वतः पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन मैदानात उतरले. त्यांनी हिंजवडीतील वाहतूक समस्येची पाहणी केली. त्यानंतर हिंजवडीतील शिवाजी चौक, तसेच वाकडमधील भुजबळ चौक आणि भूमकर चौक येथील वाहतुकीमध्ये काही बदल सुचवले. त्यामुळे आता वाहतूक कोंडी कमी होताना दिसत आहे.

हिंजवडीमध्ये एकशे पस्तीस आयटी कंपन्या असून, त्यामध्ये जवळपास चार लाख संगणक अभियंते काम करीत आहेत. तसेच, इतर कामगारांची संख्या पाहता हा आकडा जवळपास दहा लाखांवर जातो. आयटीयन्सचा सुमारे एक तास वाहतूक कोंडीत जात होता.

वाहतुकीमध्ये केलेल्या बदलामुळे येताना आणि जाताना पाऊण तासांची बचत झाली आहे. काही ठिकाणी गतिरोधकाची आवश्‍यकता असून, त्यासाठी एमआयडीसी आणि वाहतूक पोलिसांकडे पाठपुरावा सुरू आहे, असे एचआयएचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर चरणजितसिंग भोगल यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com