दोन महिलांनी वाचविले हजारो लिटर पाणी

दोन महिलांनी वाचविले हजारो लिटर पाणी

पुणे - महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा बसत असतानाच पुण्यातील दोन महिलांनी पाणी बचतीचे महत्त्व सांगण्यासाठी पुढाकार घेतला. शहरातील काही भागात त्यांनी जागृती, तर केलीच. पण गळके नळ बदलून भविष्यात वाया जाणारे हजारो लिटर पाणीदेखील वाचविले. 

पुणे शहरात अनेक ठिकाणी, सोसायट्या, वसाहती, शाळा-महाविद्यालयांमध्ये गळक्‍या नळांमुळे पाणी वाया जाते. त्याची चिंता फारशी केली जात नाही. परंतु, समाजातील अनेकजण पाण्याचा एक थेंब वाचविण्यासाठी प्रयत्नशील असतात. पल्लवी मराठे आणि भारती भोंडवे या दोघी त्यातीलच. त्यांनी मॉडेल कॉलनी परिसरातील चापेकरनगर वसाहतीमध्ये जाऊन पाहणी केली. त्या वेळी अनेक ठिकाणी गळके नळ त्यांना दिसले. 

पाणी किती वाया जाते, यासाठी त्यांनी बाटल्यांचा वापर करून तपासणी केली. सहाशे मिलिलिटरची बाटली अर्ध्यातासात, तर एक लिटरची बाटली सुमारे एक तासाच भरल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दररोज साधारणपणे पन्नास नळांमधून २०० लिटर पाणी वाया जात असून महिन्याला सहा हजार लिटर पाणी वाया जात असल्याचा दावा मराठे यांनी केला आहे.

चापेकर वसाहतीत राबविला उपक्रम
पल्लवी मराठे म्हणाल्या, ‘‘गळक्‍या नळांमधून वाया जाणारे पाणी वाचविण्यासाठी काहीतरी करावे म्हणून हा उपक्रम हाती घेतला. त्यासाठी रोटरी क्‍लब ऑफ पुणे अपटाऊनचे अध्यक्ष समीर भिडे यांनी मदत केले. तसेच मकरंद टिल्लू यांच्या सहकार्यातून आम्ही चापेकर वसाहतीमधील ३५ गळके नळ बदलले. आम्ही यापुढे विद्यापीठ, महाविद्यालये, हॉटेल, अन्य वसाहती या ठिकाणीदेखील गळके नळ बदलण्याचा उपक्रम सुरू ठेवणार आहोत.’’ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com