इंदापूर : केंद्रातील भाजपा सरकार हेव्यापाऱ्यांचे सरकार असून त्यांना शेतकऱ्यांचे काहीही देणे घेणे नाही. पाच वर्षांत भाजपचे अनेक मंत्री व नेत्यांवर आरोप झाले मात्र कोणाचीही ईडी कडून किंवा सीबीआय कडून चौकशी झाली नाही मात्र महाविकास आघाडीच्या विरोधात भाजप सूडाचे राजकारण करत आहे असा आरोप मदत व पुनर्वसन मंत्री विजय वट्टेडीवार यांनी केला.
इंदापूर शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राम वडकुते ,इंदापूर काँग्रेस तालुकाध्यक्ष स्वप्रिल सावंत, कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर, किसानसेलचे तालुकाध्यक्ष डॉ. संतोष होगले, बीएमपीचे राष्ट्रीय महासचिव ऍड. राहुल मखरे, प्रा. कृष्णा ताटे, भगवान फासगे, संतोष आरडे तुषार शेळके, महादेव लोंढे,श्रीनिवासपाटील ,आकाश पवार, युवराज गायकवाड,विपुल भिलारे, राहुल जाधव, राहुल वीर, रमेश शिंदे, भगवान कोळेकर उपस्थित होते.
मंत्री वट्टेडीवार पुढे म्हणाले, सत्ता गेल्यानंतर भाजपा सैरभैर झाला असून सत्तेत पुन्हा येण्यासाठी ईडी, सीबीआय किंवा इन्कम टॅक्स चा गैरवापर केला जातो. महाविकासआघाडी सरकारला या सर्वाचा वापर करून बदनाम कसे करता येईल हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. भविष्यासाठी हे सर्वांसाठीच घातक आहे कारण सत्तेचा मुकुट कोणीही आयुष्यासाठी घालून येत नाही. सत्ता येत असते, सत्ता जात असते मात्र विरोधी बाकावर बसलेली भाजपा ही खुर्चीसाठी भांडते हे महाराष्ट्राचे दुर्देव असल्याचे शेवटी मंत्री वट्टेडीवार यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.