एकनाथांनंतर प्रथमच ओवीबद्ध टीका - गोडबोले

Vivekshashtri-Godbole
Vivekshashtri-Godbole

पुणे - ‘शंकर रामायण, अयोध्याकाण्ड’ म्हणजे मराठी सारस्वतांचा अलंकार असून, वाल्मीकी रामायणावरील अशी व्यापक ओवीबद्ध टीका संत एकनाथांनंतर मराठी भाषेत प्रथमच सिद्ध होत आहे,’ असे प्रशंसोद्‌गार वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांनी काढले. 

डॉ. शंकर अभ्यंकरलिखित ‘शंकर रामायण, अयोध्याकाण्ड’ या ग्रंथाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. या वेळी पंचांगकर्ते मोहनराव दाते, अपर्णा अभ्यंकर, धर्मादाय आयुक्त लक्ष्मीकांत देशमुख आदी उपस्थित होते.

अभ्यंकर म्हणाले, ‘‘सुमारे एक हजार पृष्ठे आणि सोळा हजार ओव्या या ग्रंथात आहेत. या बृहद्‌ काव्यातील सौंदर्यस्थळे अपर्णा अभ्यंकर यांनी ‘रसपरितोष अमृत ते हे रामचन्द्रचरित’ अशा मार्मिक ओव्यांतून उलगडली आहेत. या महाकाव्याचा बालकाण्ड हा प्रथम खंड दोन वर्षांपूर्वीच प्रसिद्ध झाला असून, पुढे अजून पाच काण्ड प्रकाशित होणार आहेत. त्यामुळे शंकर रामायणाची एकूण ओवीसंख्या पाऊण ते एक लाख इतकी होण्याची शक्‍यता आहे.’’

श. म. हळदे यांचा गौरव
या वेळी आदित्य प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा ‘भारतीय संस्कृती गौरव पुरस्कार’ श. म. हळदे यांना देण्यात आला. त्यानंतर अभ्यंकर यांचे ‘भावार्थ सापडे निरुपणी’ हे वारकरी कीर्तन झाले. सूत्रसंचालन रश्‍मी तुळजापूरकर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com