शासनाने अतिरिक्त ऊसाच्या गाळपाचे योग्य नियोजन करावे : वासुदेव काळे

अन्यथा शेतकरी व भाजप किसान मोर्चाच्यावतीने तीव्र आंदोलनाचा इशारा
sugarcane
sugarcanee sakal
Summary

शासनाने अतिरिक्त ऊसाच्या गाळपाचे योग्य नियोजन करून 15 एप्रिल 2022 पर्यंत ऊस नोंद व तोडीचे नियोजन ऑनलाईन जाहिर करावे.

कुरकुंभ - राज्यात चालू गळीत हंगामात गाळपासाठी जाणाऱ्या ऊसाचे (sugarcane) क्षेत्र व साखर कारखान्यांची गाळप क्षमतेचा विचार केल्यास शेतकऱ्यांचा ऊस गाळपाविना शिल्लक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने अतिरिक्त ऊसाच्या गाळपाचे योग्य नियोजन करून 15 एप्रिल 2022 पर्यंत ऊस नोंद व तोडीचे नियोजन ऑनलाईन (onlline) जाहिर करावे. अन्यथा, ऊसउत्पादक शेतकरी व भाजप किसान मोर्चाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी साखर आयुक्तांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी साखर आयुक्तांना लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे, की राज्यात सध्या गाळप हंगाम सुरू असलेल्या कारखान्यांची गाळप क्षमतेपेक्षा गाळपासाठी जाणाऱ्या ऊसाचे क्षेत्र जास्त आहे. त्यामुळे यंदा अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. आपल्या ऊसाचे गाळप होईल का नाही याची भिती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. ऊसाचे गाळप न झाल्यास मोठयाप्रमाणात नुकसान होण्याची भिती निर्माण झाल्याने ऊसतोडीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. त्यामुळे ऊसउत्पादक शेतकऱ्यांपुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात गाळपासाठी उपलब्ध असणाऱ्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप होईपर्यंत परिसरातील कारखाने बंद करण्यात येऊ नये असे आदेश शासनाने द्यावेत.

गाळपासाठीच्या अतिरिक्त ऊसाच्या नोंदीचा बारकाईने अभ्यास करून ऊसतोडणीचे नियोजन करावे. काही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊसतोडणी य॔त्रणा पुरेशी नसल्याने ऊस शिल्लक राहण्याची भिती शेतकऱ्यांमध्ये आहे. ऊस शिल्लक राहण्याची शक्यता असणाऱ्या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊसतोडणी यंत्रणा कमी आहे. त्याठिकाणी इतर कार्यक्षेत्रातील ऊसतोडणी मजूर व ऊसतोडणी करणारी यंत्रे उपलब्ध करून द्याव्यात. शासनाने राज्यातील संपूर्ण ऊस गाळपाचे काटेकोर नियोजन करावे. गाळप होणाऱ्या ऊसाची नोंद व त्याचे तोडणीचे नियोजन ऑनलाईन जाहिर करण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार शासनाने सदर मागणीची गांभीर्याने दखल घेऊन 15 एप्रिल 2022 पर्यंत शेतकऱ्यांच्या गाळपासाठी असलेल्या ऊसाची माहिती एकत्रित करून याची तोडणी कधी होणार याची सविस्तर माहिती ऑनलाईन जाहिर करावी. अन्यथा भाजप किसान मोर्चाच्या व ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com