शिरूर शहरात पाण्याची टंचाई; वीज नसल्याने खोळंबा (व्हिडिओ)

शिरूर शहरात पाण्याची टंचाई; वीज नसल्याने खोळंबा
शिरूर शहरात पाण्याची टंचाई; वीज नसल्याने खोळंबा

टाकळी हाजी (पुणे): शिरूर तालुक्‍यातील घोड नदीला पाणी आले असले, तरीदेखील वीज नसल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. तत्काळ आठ तास वीज द्यावी, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.

बाबू गेनू जलाशयातून (डिंभे धरण) घोड नदीला 600 क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पिंपरखेड ते शिरूरपर्यंतचे सर्व बंधारे पाण्याने भरून वाहताना दिसू लागले आहेत. शिरूर शहराची 50 हजार लोकसंख्या असून, त्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली होती. पिण्याच्या पाण्याची कमतरता, यामुळे हे पाणी तातडीने पाटबंधारे विभागाच्या मदतीने शिरूर बंधाऱ्यात नेण्यात आले आहे. त्यातून या भागातील घोड नदीतील सर्व बंधारे पाण्याने भरलेले दिसून येतात. यानंतर या भागाला उन्हाळी आवर्तनातून पाणी मिळेल की नाही, याबाबत कोणतीच माहिती मिळत नाही. त्यामुळे हे मिळालेले आवर्तन जपून वापरणे गरजेचे आहे. पाणी जपून वापरण्याचे आवाहन करत संबंधित अधिकाऱ्यांनी नदीकाठी फक्त दोन तास विजेची उपलब्धता करून दिली आहे. त्यामुळे नदीकिनारी अवघे दोन तास थ्री-फेजचे विद्युत पंप चालू राहतात. या परिसरात या बंधाऱ्यावरून गावच्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. दोन तास विजेवर पाण्याच्या टाक्‍या भरल्या जात नाहीत. त्यामुळे सध्या पाणी असूनही गावाला पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी जोर धरू लागल्या आहेत. कवठे येमाई (ता. शिरूर) येथे बुधवारी नळाला पाणीच आले नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या. येथील वीज जास्त वेळ सुरू ठेवावी, अशी मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com