‘स्मार्ट सिटी’तील औंध, बाणेर, बालेवाडीत पाणीटंचाई?; टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल ८५ लाखांच्या निविदा

‘स्मार्ट सिटी’तील औंध, बाणेर, बालेवाडीत पाणीटंचाई?; टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल ८५ लाखांच्या निविदा

पुणे - पुण्यातील ४० लाख लोकसंख्येला पुढील नऊ महिने पुरेल एवढे पाणी धरणात आहे. आजघडीला २७ अब्ज घनफूट (टीएमसी) इतका पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजे, पुणेकरांना पाणीटंचाई जाणवणार नाही. मात्र, ‘स्मार्ट सिटी’तील औंध, बाणेर, बालेवाडीत रोजच पाणीटंचाई भासतेय. म्हणून, इथल्या रहिवाशांना टॅंकरने पाणी पुरविण्यासाठी पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तब्बल ८५ लाख रुपयांच्या निविदाही काढल्या आहेत.

खरंतर या भागात कुठेच पाणीटंचाई नाही आणि सगळीकडे पुरेसे पाणी येत असल्याचे नगरसेवक सांगताहेत; तेव्हा या निविदा कशासाठी?, हे अधिकाऱ्यांनाही सांगता आले नाही. पाणीपुरवठ्याचे नियोजन झालंय, निविदाही काढल्या; तर मग नेमक्‍या कोणत्या भागात टॅंकरने पाणीपुरवठा करायचाये ?, ती गरज का भासली?, तिथे किती लोकसंख्या आहे ? या प्रश्नांची उत्तरे अधिकाऱ्यांनाही देता आली नाहीत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यात यंदा पाऊस लांबला आणि खडकवासला धरण साखळी शंभर टक्के भरली. त्यामुळे पुणेकरांना रोज पाच तास आणि तो ही पुरेशा दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. औंध, बाणेर, बालेवाडीत तर मुबलक पाण्याची सोय आहे. तरीही पाणीपुरवठा खात्यातील अधिकाऱ्यांनी ८५ लाख रुपयांच्या निविदा काढल्या आहेत, त्याही औंध (प्रभाग क्र. ८) आणि बाणेर-बालेवाडी (प्रभाग क्र. ९) या परिसरासाठी. प्रत्यक्षात एवढ्या रकमेतून पाणीपुरवठा करण्याइतपत पाणीटंचाई नसल्याचे या प्रभागांतील सर्वच नगरसेवक सांगत आहेत. दरम्यान, गेल्यावर्षी पाणी पुरवठ्यासाठी असा खर्च करण्याची वेळ आली नाही.

टॅंकरबाबत माहितीच नाही
औंध, बाणेर, बालेवाडीत कुठे पाणी पुरविण्याची गरज आहे का, असा प्रश्न महापालिकेच्या पाणीपुरवठा खात्याच्या अभियंता वैशाली गिरगे यांना विचारला. त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘सध्या रहिवाशांना कुठेही पाणी कमी पडत नाही. मात्र, त्यांच्या मागणीनुसार पाणीपुरवठा करावा लागतो. त्यासाठी या निविदा काढल्या आहेत. निविदांची रक्कम ठरली तेव्हा त्यातून किती टॅंकर पुरविणार आहे, हे मात्र गिरगे यांना सांगता आले नाही. 

बाणेर- बालेवाडीतील रहिवाशांना रोज पुरेशा प्रमाणात पाणी सोडण्याची व्यवस्था झाली आहे. त्यामुळे दोन-अडीच वर्षात तरी, टॅंकरने पाणी घेण्याची गरज भासली नाही. रहिवाशांकडूनही टॅंकरची मागणी होत नाही. सध्या तरी टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची कल्पना नाही. 
- अमोल बालवडकर, नगरसेवक

काही भागांतील रहिवाशांकडून पैसे घेऊन टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. परंतु, टॅंकरसाठी इतक्‍या रकमेच्या निविदा का काढल्या? 
- सुनीता वाडेकर, नगरसेविका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com