हजार लिटर पाण्याला १२ रुपये

Well
Well

पिंपरी - तहानलेल्यांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणाऱ्या खासगी विहिरींच्या मालकांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात राज्य सरकारने तब्बल ३५ वर्षांनंतर सुधारणा केली आहे. या सुधारणेनुसार विहीरमालकांना एक हजार लिटर पाण्यासाठी १२ रुपये मोबदला मिळणार आहे. याशिवाय पाणी उपशासाठी विजेसह सर्व यंत्रणा उपलब्ध करून देणाऱ्या शेतकऱ्यांना दिवसाला प्रत्येकी ६०० रुपये, तर यंत्रणा न देणाऱ्यांना प्रत्येकी ४५० रुपयांचा पाणी मोबदला दिला जाणार आहे. राज्य सरकारने तब्बल ३५ वर्षांनंतर यंदा या पाणी मोबदल्यात सुधारणा केली आहे.

राज्यात पिण्याच्या पाण्याचे अधिगृहण करण्याबाबत १५ एप्रिल १९८३ मध्ये कायदा करण्यात आला आहे. या कायद्याला ‘महाराष्ट्र पिण्याच्या पाण्याचे अधिग्रहण अधिनियम १९८३’ असे म्हटले जाते. या अधिनियमातील कलम ३ नुसार पाणीटंचाई कालावधीत ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी खासगी जलसाठे अधिग्रहीत करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आला आहे. शिवाय याच अधिनियमातील कलम ८ (अ) आणि (ब) नुसार खासगी मालकांचे पाणीसाठे अधिग्रहीत करण्यात आल्यानंतर त्यांना पाण्याचा मोबदला देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com