जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धाब्यावर

Water-Theft
Water-Theft

पुणे - धायरी येथील पाणीचोरी प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही अद्याप जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आल्यामुळे यासंदर्भातील अहवाल देणे शक्‍य झाले नसल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

धायरी येथील पाणीचोरी प्रकरण ‘सकाळ’ने उघडकीस आणले होते. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी एक पथक पंचनामा करण्यासाठी त्या ठिकाणी पाठविले होते. संबंधित पथकाने आपला अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला; परंतु त्या अहवालात अनेक त्रुटी असल्याचे ‘सकाळ’ने निदर्शनास आणून दिले होते. पॉइंट मालक त्यातून सुटतील कसे, अशा पद्धतीने हा पंचनामा तयार करण्यात आला असल्याची शंका व्यक्त केली जात होती.  ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथक पाठवून चौकशी करण्याचा आदेश दिला होता. त्यास आठवडा होत आला. मात्र तहसीलदारांच्या नेतृत्वाखालील पथकाने अद्यापही या संदर्भातील अहवाल सादर केला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com