पाणी असूनही कपात कशासाठी? 

पाणी असूनही कपात कशासाठी? 

पुणे - मुंढवा जॅकवेलमध्ये 550 एमएलडी पाणी उपलब्ध असूनही जलसंपदा विभागाने गेल्या 22 दिवसांत रोज 370 एमएलडी पाणी शेतीसाठी उचलले आहे. त्यामुळे शेतीसाठी पाण्याची गरज भागत असतानाही पुण्यावर पाण्याची कपात का लादण्यात आली, असा प्रश्‍न सजग नागरिक मंचने पालकमंत्री गिरीश बापट यांना निवेदनाद्वारे विचारला आहे. 

कालवा समितीच्या बैठकीत पुण्याला 1350 ऐवजी 1150 एमएलडी पाणी देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे दिवाळीनंतर दिवसातून एकदाच पाणी देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शेतीसाठी पाणी द्यायचे आहे, म्हणून पुण्यात पाणीकपात केली आहे, असे त्या वेळी सांगण्यात आले होते. परंतु मुठा उजवा कालवा फुटल्यानंतर एक थेंबही पाणी शेतीसाठी सोडले नाही. त्यामुळे शेतीसाठी मुंढवा जॅकवेल हाच एकमेव पाण्याचा स्रोत उपलब्ध राहिला आहे. परंतु तेथे 550 एमएलडी पाणी असतानाही जलसंपदा विभागाने 22 दिवसांत दररोज सरासरी 370 एमएलडी पाणी उचलले आहे. त्यामुळे शेतीसाठी तेवढे पाणी पुरेसे आहे, असे दिसून येते. त्यामुळे पुण्यात 1350 वरून 1150 एमएलडी पाण्याची कपात करण्याचे कारणच काय, असा प्रश्‍न सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर, विश्‍वास सहस्रबुद्धे यांनी निवेदनात उपस्थित केला आहे. वाचलेले 200 एमएलडी पाणी पुण्यासाठी देऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com