आयआयटीमध्ये प्रवेशासाठी काय असावी रँक?

Durgesh Mangeshkar
Durgesh Mangeshkar

देशातील २३ आयआयटीमधील प्रवेशासाठी यंदा घेण्यात आलेल्या जेईई अॅडव्हान्स परीक्षा ही तुलनेने अवघड होती. त्यामुळे यंदा कट ऑफ हा कमी असेल, असे वाटले होते. परंतु विद्यार्थ्यांनी परीक्षेची चांगली तयारी केली असल्यामुळे पेपर अवघड असूनही कट ऑफ हा गेल्या वर्षीच्या कट ऑफच्या जवळपास जाणारा आहे.

गेल्या चौदा वर्षातील जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा विचार केला, तर २०१६ या वर्षातील पेपर सर्वांत अवघड समजले जातात. मात्र यंदाचे पेपर हे देखील २०१६च्या पेपरच्या काठिण्य पातळीजवळ जाणारे होते. परंतु तरीही कट ऑफ हा तुलनेने गेल्या वर्षीच्या कट ऑफ प्रमाणे आहे. देशामध्ये मुंबई, चेन्नई, कानपूर, खरगपूर आणि दिल्ली या सर्वांत जुन्या आणि ‘टॉप पाच’ आयआयटीज्‌ समजल्या जातात.

या ‘टॉप पाच’ आयआयटीमध्ये तुम्हाला प्रवेश हवा असेल, तर देश पातळीवरील तुमची रॅंक ही तीन ते साडेतीन हजारपर्यंत असली पाहिजे. आयआयटीमध्ये चार वर्षांचा बीटेक आणि पाच वर्षांची डुएल डिग्री करण्यासाठी यंदाही चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. त्यातही कॉम्प्युटर सायन्स, इलेक्‍ट्रिकल, मॅकेनिकल या विद्याशाखांमध्ये प्रवेश हवा असल्यास उच्च रॅंक असणे आवश्‍यक आहे. या ‘टॉप पाच’ आयआयटीमध्ये तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स हवे असल्यास तुमचा देश पातळीवरील तुमचा रॅक हा ‘बीटेक’साठी २५० पर्यंत, तर ‘एमटेक’साठी ५५० पर्यंत रॅंक असणे अपेक्षित आहे. त्यातही तुम्हाला आयआयटी, मुंबईमध्ये प्रवेश हवा असेल, तर तुमची रॅंक ही ५०च्या आत असली पाहिजे.

जेईई अॅडव्हान्स निकालानंतर आता येत्या दोन-तीन दिवसांत आयआयटी प्रवेशाची प्रक्रिया जाहीर होईल. त्यातही पहिला, दुसरा, तिसरा अशा प्रवेश फेऱ्या असतात. परंतु ही प्रक्रिया जुलै पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण होते.

दुर्गेश मंगेशकर info@iitpk.com संचालक, आयआयटीपी, पुणे

(शब्दांकन : मीनाक्षी गुरव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com