
RBI: रिझर्व्ह बँकने सुरू केली '100 डेज 100 पे' विशेष मोहीम, प्रत्येक बँकेतील हक्क नसलेल्या ठेवींचा होणार...
Reserve Bank of India: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकांसाठी विशेष '100 डेज 100 पे' कार्यक्रम जाहीर केला आहे. या बँकांमध्ये दावा न केलेला पैसा म्हणजेच दावा न केलेल्या ठेवी गोळा करून त्यांची सेटलमेंट करण्याचा हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 12 मे रोजी 100 दिवस 100 पेमेंट मोहिमेची घोषणा केली. या अंतर्गत, 100 दिवसांच्या आत, भारतातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक बँकेत जमा केलेल्या 100 हक्क नसलेल्या ठेवी शोधून त्यांची सेटलमेंट केली जाईल.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने आपल्या मोहिमेबद्दल सांगितले आहे की अशा प्रकारे, बँकेमध्ये दावा न केलेल्या ठेवींचे प्रमाण कमी केले जाईल आणि अशा ठेवी त्यांच्या हक्काच्या मालक किंवा दावेदारांपर्यंत पोहोचवल्या जातील.
दावा न केलेली ठेव ही अशी आहे ज्यामध्ये 10 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी कोणीही पैसे काढणे किंवा व्यवहार केले गेले नाहीत. ही एक प्रकारची निष्क्रिय ठेव मानली जाते.
केंद्रीकृत वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे:
6 एप्रिल रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दावा न केलेल्या ठेवींचा मागोवा घेण्यासाठी केंद्रीकृत वेब पोर्टल सुरू केले होते.
सध्या, 10 वर्षांहून अधिक जुन्या हक्क नसलेल्या ठेवी शोधण्यासाठी अनेक बँकांच्या वेबसाइटवर जावे लागते.
2023-24 या आर्थिक वर्षातील पहिल्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीचे निकाल जाहीर करताना, शक्तीकांत दास म्हणाले की, RBI च्या या उपक्रमामुळे ठेवीदारांना त्यांचे बँकेत जमा केलेले पैसे परत मिळण्यास मदत होईल.
बँकांनी दावा न केलेल्या ठेवींची रक्कम:
सरकारकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीवरून अलीकडेच बँकांकडे पडून असलेल्या, दावा न केलेल्या ठेवींमध्ये घट झाल्याचे समजते. वर्षभरापूर्वी ही रक्कम 48,262 कोटी रुपये होती, आता ही रक्कम 35,012 कोटींवर आली आहे.