Gandhi Jayanti : महात्म्याबद्दल मोदी...!

Gandhi Jayanti : महात्म्याबद्दल मोदी...!

आज जगासमोर असलेल्या समस्या सोडविण्याची क्षमता गांधीविचारांमध्ये आहे.
भारत ही महात्मा गांधींची म्हणजेच अंहिसेची भूमी आहे.
स्वातंत्र्यलढ्यापेक्षा गांधीजींनी स्वच्छतेला महत्त्व दिले. स्वच्छता ही त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. 
गांधीजींचा सत्याग्रहाचा उद्देश स्वातंत्र्यप्राप्तीसाठी होता, तर स्वच्छतेचा उद्देश स्वच्छ भारतासाठी होता.
स्वच्छ भारत अभियानातून हे गांधीजींचे स्वच्छतेचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.
गांधीजींना श्रद्धांजलीसोबत स्वच्छतेची कार्यांजली अर्पण करायची आहे.
गांधीजींनी जलसंधारणासाठी स्वतः प्रयत्न केले, त्यांच्या पोरबंदरच्या घरी पावसाचे पाणी साठवण्याची सोय आजही आपल्यासाठी शिकवण आहे. 
२ ऑक्‍टोबरला फक्त एक व्यक्ती जन्माला नाही आला, तर एका युगाचा प्रारंभ झाला होता. गांधीजींचे तत्कालीन विचार आजच्या काळातसुद्धा तेवढेच समर्पक आहे.
गांधीजींच्या प्रेम आणि अंहिसेची शिकवण जगातील दहशतवाद आणि ग्लोबल वॉर्मिंगसारख्या समस्या सोडविण्यास सक्षम आहे.
महात्मा गांधीजींचे पर्यावरणावर प्रचंड प्रेम होते. निसर्ग, पर्यावरणाची नासाडी करणाऱ्या लोकांवर ते आगपाखड करत असे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com