चेतना तरंग : गुढीपाडवा

वसंत ऋतू म्हणजे नव्या उत्साहाने आणि चैतन्याने निसर्गात सर्व काही नव्याने सुरू होण्याचा काळ. भारतातील अनेक भागांत, वसंत ऋतूतील सर्वांत मोठ्या दिवसाच्या आसपास येणाऱ्या प्रतिपदेला नवीन वर्ष साजरे केले जाते.
gudi padwa
gudi padwasakal
Summary

वसंत ऋतू म्हणजे नव्या उत्साहाने आणि चैतन्याने निसर्गात सर्व काही नव्याने सुरू होण्याचा काळ. भारतातील अनेक भागांत, वसंत ऋतूतील सर्वांत मोठ्या दिवसाच्या आसपास येणाऱ्या प्रतिपदेला नवीन वर्ष साजरे केले जाते.

वसंत ऋतू म्हणजे नव्या उत्साहाने आणि चैतन्याने निसर्गात सर्व काही नव्याने सुरू होण्याचा काळ. भारतातील अनेक भागांत, वसंत ऋतूतील सर्वांत मोठ्या दिवसाच्या आसपास येणाऱ्या प्रतिपदेला नवीन वर्ष साजरे केले जाते.

कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणात याला उगाडी म्हणतात, तर महाराष्ट्रात गुढीपाडवा. सिंधी लोक याला चेट्टी चांद म्हणतात, तर मणिपुरी लोक साजीबू नोंगमा पानबा म्हणतात. बाली आणि इंडोनेशियामधील हिंदू नेईपी म्हणतात.

निसर्गाप्रमाणेच आपणही भूतकाळातील सर्व नकारात्मकता टाकून देऊन नवीन उत्साहाने पुढे जाण्याची हीच वेळ आहे. जेव्हा आपली भावना बळी पडल्याची किंवा अपराधीपणाची असेल, तेव्हा असे करणे अवघड होते. नवीन वर्ष साजरे करणे म्हणजे काळ, मन, आणि स्वत:चा सन्मान करणे आणि स्वत:चा सन्मान करणे म्हणजे आपण बळीही पडलेलो नाही आणि अपराधीही नाही, हे जाणणे. तुमच्या हातून काहीतरी चूक होते, तेव्हा तुम्हाला अपराधी आणि पापी वाटायला लागते. मग तुम्हाला मनातून अजिबात शांत वाटत नाही. तुम्ही हे समजून घ्यायला हवे, की तुम्ही वैश्विक प्रेमाचा प्रकाश आणि ठिणगी आहात. हे तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही अपराधी भावनेतून बाहेर याल.

दुसरीकडे, आपल्याला असे वाटले की आपण बळी पडला आहात, तर आपण कधीही जीवनाचे सत्य बघू शकणार नाही. येथे राहण्याचा उद्देश म्हणजे, प्रेम, आनंद आणि बुद्धी हे जीवनाचे सर्व पैलू व्यक्त करणे. तुम्ही परिस्थितीचे, काळाचे आणि इतर लोकांचे बळी झाला आहात असे तुम्हाला वाटते, तेव्हा तुम्ही जीवन एक उत्सव म्हणून खऱ्या अर्थाने उपभोगू शकणार नाही. जीवन हे कडू-गोड अनुभवांचे मिश्रण आहे याची आठवण राहावी म्हणून, कर्नाटकात लोक उगाडीला कडूनिंबाची पाने आणि मिठाई खातात. आनंददायी आणि अप्रिय दोन्ही. अप्रिय गोष्टी तुम्हाला अंतर्मुख बनवतात. त्या तुम्हाला आणि त्याने तुमच्या मनाला एक सखोलता प्राप्त होते आणि तुमचे व्यक्तिमत्त्व खुलते.

सर्व तक्रारी सोडून द्या आणि त्या सर्व कटू दिवसांचे धन्यवाद माना कारण त्यांनी तुम्हाला बळ दिले आहे. आनंददायी दिवसांनी तुम्हाला तुमच्या खऱ्या क्षमतेची जाणीव करून दिली आणि तुम्ही स्वत: जो आनंद आहात तो व्यक्त करण्याची संधी दिली! आनंददायी आणि अप्रिय दोन्हीचे धन्यवाद मानण्याने आपण बळी पडल्याच्या भावनेतून बाहेर पडतो. आनंदी होण्याचा आणि आनंद पसरविण्याचा निश्चय करून येत्या नवीन वर्षाचे आपण स्वागत करूयात. एकूण लोकसंख्येपैकी एक टक्का लोकांनी ध्यान केले तरी बाकीच्या ९९ टक्के लोकांना त्याचा फायदा होतो. या वर्षी आपण सर्वांनी ध्यान करून ज्ञानरूपी खजिना जपूया. जीवनाचा उत्सव साजरा करण्यासाठी ही सजावट आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com