दिलासादायक! साताऱ्यात 18 लाख लाभार्थ्यांना मोफत धान्य; केशरी कार्डधारकांवर अन्याय

कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने शासनाने लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे.
Foodgrains
Foodgrainsesakal

सातारा : कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये शासनाने निर्बंध घातले आहेत. त्यासोबतच काही दिलासादायक निर्णयही घेतले आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत दिला जाणार आहे. त्याचा जिल्ह्यातील तब्बल 18 लाख सात हजार लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. त्यामध्ये "अंत्योदय'चे एक लाख 31 हजार, तर प्राधान्य कुटुंबातील 16 लाख 76 हजार लाभार्थ्यांचा समावेश आहे. अद्याप शासनाकडून हे धान्य उपलब्ध झाले नसले तरी येत्या आठवडाभरात उपलब्ध होईल.

कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने शासनाने लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये लॉकडाउन जाहीर केले. त्यावेळी सर्वसामान्य जनतेला सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून धान्य देण्यात आले होते. तसेच केशरी कार्डधारकांनाही सवलतीच्या दरात धान्य देण्यात आले. त्याचा शुभ्र वगळता उर्वरित सर्व प्रकारच्या रेशनकार्डधारकांना फायदा झाला. आता एक वर्षानंतर पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे शासनाने पुन्हा एकदा लॉकडाउन जाहीर केले आहे. यावेळेस मात्र, मोफत धान्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.

जिल्ह्यात "अंत्योदय'चे 28 हजार रेशनकार्डधारक आहेत, तर प्राधान्य कुटुंबातील तीन लाख 82 हजार कार्डधारक आहेत. या सर्वांना मोफत धान्य मिळणार आहे. त्यामध्ये तीन किलो गहू व दोन किलो तांदळाचा समावेश आहे. हे धान्य सर्व रेशन दुकानांवर उपलब्ध केले जाणार आहे. अद्याप हे धान्य पुरवठा विभागाकडे उपलब्ध झालेले नाही. मात्र, येत्या काही दिवसांत उपलब्ध झाल्यानंतर त्याचे लाभार्थी संख्येनुसार वितरण होणार आहे. जिल्ह्यात "अंत्योदय'चे एक लाख 31 हजार लाभार्थी असून प्राधान्य कुटुंबांचे 16 लाख 76 हजार लाभार्थी आहेत. शासनाच्या नियमानुसार एकूण 18 लाख सात हजार लाभार्थ्यांना हे मोफत धान्य मिळणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पुन्हा एकदा रेशनवरील मोफत धान्य मिळणार असल्याने नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे. शासनाकडून हे धान्य लवकरात लवकर उपलब्ध होणे गरजेचे आहे. लॉकडाउन संपण्यापूर्वी धान्य उपलब्ध व्हावे, अशी अपेक्षा या लाभार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.

केशरी कार्डधारकांवर अन्याय

मागील वेळी केशरी कार्डधारकांना सवलतीच्या दरात रेशनवरील धान्य उपलब्ध केले होते. पण, यावेळेस मात्र, केशरी कार्डधारकांचा मोफत धान्यात समावेश नाही. सवलतीच्या दरात गहू, तांदूळ व डाळी शासनाने उपलब्ध केल्यास या लाभार्थ्यांनाही दिलासा मिळणार आहे. त्यामुळे शासनाने याबाबतही निर्णय घेणे गरजेचे आहे, तरच लॉकडाउन सुसह्य होईल.

Edited By : Balkrishna Madhale

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com