जिल्हा परिषदेत कर्तव्य बजावणाऱ्या 625 कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात

जिल्हा परिषदेत कर्तव्य बजावणाऱ्या 625 कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात

सातारा : कोरोनाच्या संसर्गात जिल्हा परिषदेचे 721 कर्मचारी आतापर्यंत बाधित झाले आहेत. त्यामधील 625 कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली. यामधील काही कर्मचारी कर्तव्यावरही रुजू झाल्याचे जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी सांगितले. 

ते म्हणाले, "जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांनी गेली सात महिने अविरतपणे कर्तव्य बजावत असताना कोरोनाशी लढा दिला आहे. यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कर्मचाऱ्यांनीही मोठ्या धैर्याने या संकटाचा सामना केल्याचे दिसून आले, तसेच आरोग्य विभाग, अंगणवाडी, पोलिस महसूल विभाग अशा विविध विभागांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सुटी न घेता कोरोना नियंत्रणाचे काम अविरतपणे सुरू ठेवले आहे.'' 

मार्च महिन्यापासून आतापर्यत जिल्हा परिषदेचे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 13 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर बाधित कर्मचाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा परिषदेमध्ये कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. यासाठी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणारे सर्वच विभाग कोरोना नियंत्रणासाठी झटत आहेत.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com