कितीही आघाड्या करा, भाजपच अव्वल ठरेल : भरत पाटील

कितीही आघाड्या करा, भाजपच अव्वल ठरेल : भरत पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : 'कुणी कितीही आघाड्या आणि वल्लग्ना करू द्यात, मतदार सुज्ञ असल्याने भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार विजयी होणार', असा विश्वास पक्षाचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य भरत पाटील यांनी येथे व्यक्त केला. पाटण तालुक्यातील मतदारांनी विरोधकांचा फसवा फुगा फोडावा असे आवाहनही त्यांनी केले.

भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाचे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील उमेदवार संग्राम देशमुख व जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ तळमावले (ता.पाटण) येथे नुकत्याच झालेल्या मेळाव्यात भरत पाटील बोलत होते. यावेळी विक्रमबाबा पाटणकर, कविता कचरे, रामभाऊ लाहोटी ,फत्तेसिंह पाटणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

श्री.पाटील म्हणाले,'पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची संपूर्ण विकासाकडे वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्रातील जनतेचा कौल भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीला असताना ऐनवेळी भाजपला डावलून सत्तेवर आलेल्या तीन पक्षांच्या आघाडीला जनतेने आता चांगलेच ओळखले आहे. जनतेच्या मतांचा अनादर करून तयार झालेल्या अशा प्रकारच्या आघाड्या फार दिवस टिकत नसतात, हा इतिहास आहे. त्यामुळे होवू घातलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये जरी तिघांचे संख्याबळ दिसत असले तरी हा दिखावाच ठरणार आहे, त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. 

नेहमीप्रमाणे भारतीय जनता पक्षाचेच उमेदवार निवडणूक जिंकणार हे अटळ सत्य आहे. पदवीधर व शिक्षक मतदार सुज्ञ असल्याने सध्याच्या राजकीय परिस्थितीचा फायदा हा निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनाच होईल.राज्यात प्रत्येक क्षेत्रामध्ये जनतेची होणारी पिळवणूक व तिघाडी विषयीचा राग मतदानातून दिसणार आहे'. कविता कचरे यांनी आभार मानले.

मराठा ही निर्णायक जात; विश्वासघात झाल्यास जनताच तुम्हांला खाली खेचेल : उदयनराजे 

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com