सातारा : एफआरपीची रक्कम थकित ठेऊन ऊस नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्यास साखर आयुक्तांनी जप्तीच्या कारवाईची नोटीस बजावली आहे. कारखान्यांकडे 2019-20 मधील गाळप हंगामातील 33.82 कोटी रुपयांची रक्कम 15 टक्के व्याजासह थकीत आहे. ही थकीत रक्कम महसूलची थकबाकी समजून कारखान्याची मालमत्ता, साखर, मोलॅसिस आणि बगॅस याची विक्री करून त्यातून ही रक्कम वसूल करावी. या येणाऱ्या रकमेतून शेतकऱ्यांची थकित देणी भागवावी, असे आदेश आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना काढले आहेत.
यासंदर्भात कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले म्हणाले, ""अंतिम महिन्यातील काही बिल देण्याचे राहिले आहे, ही वस्तुस्थिती आहे. गेली तीन ते चार महिने हे बिले देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. काही रकमेला राज्य सरकारने हमी देणे आवश्यक होते. याबाबतची प्रक्रिया होण्यास वेळ लागल्याने ही वेळ आली आहे. बॅंकेने आम्हाला तब्बल 32 अटीशर्ती घातलेल्या आहेत. त्याची पूर्तता होण्यास दोन-चार दिवस जाणार आहेत. आम्ही 30 तारखेपर्यंत बिले देणार होतो; पण शेतकऱ्यांचे हित पाहून राज्य सरकार आणि आयुक्तांनी घेतलेली भूमिका योग्य आहे.
सातारा : 'किसन वीर' ची हाेणार जप्ती ?
यापूर्वी 2017 मध्ये अशीच नोटीस कारखान्याला आली होती. त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी एक महिन्याची मुदत दिली होती. त्या वेळी 130 कोटींची रक्कम होती, आता 32 कोटी रुपये आहेत. आता जिल्हाधिकारी त्यांच्या अधिकारात किसन वीरच्या मालमत्तेची विक्री करून पैसे वसूल करतील. कारखान्याच्या गोदामात साखर आहे, ती विकून पैसे देतील. त्यांच्यावर काही प्रेशर असेल. त्यामुळे त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली आहे.'' उशीर झालाय, पैसेही द्यायचे आहेत; पण तरीही आम्ही आमचे प्रयत्न सुरू ठेवणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पर्यटनाचा घ्या मनसोक्त आनंद! महाबळेश्वर, पांचगणीतील पॉईंट खुले
Edited By : Siddharth Latkar
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.