सातारा : भाजपकडून नेत्यांच्या बदनामीची मोहीम; मलिकांच्या अटकेवरून जयंत पाटलांची टीका

इडीचे आणि भाजपचे काम कन्सल्टंशी कंपनीसारखे सुरु आहे
 जयंत पाटील
जयंत पाटील sakal

कऱ्हाड: महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात होते. ते फसल्यानंतर आता आघाडी सरकारमधील मंत्र्यांना, नेत्यांना बदनाम करण्याची मोहीम भाजपने हाती घेतली आहे. इडीचे आणि भाजपचे काम कन्सल्टंशी कंपनीसारखे सुरु आहे, अशी टीका जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर आज सोमवारी कऱ्हाड (जि.सातारा) येथे केली.

 जयंत पाटील
Satara : धरणातील गढूळ पाणी नदीपात्रात

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने “राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा” कार्यक्रमाचे आयोजन आज येथे करण्यात आले होते. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत संवाद यात्रा झाली. त्यानंतर मंत्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडी सरकावर सध्या भाजप नेत्यांकडून ईडीच्या कारवाईवरून टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांनाही अटक करण्यात आली आहे. सरकावर केल्या जात असलेल्या टिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मंत्री पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, सध्या मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. एक प्रकारे ओढून ताणून मलिक यांना अडचणीत आणण्याचा दृष्टीने हे प्रकरण तयार करण्यात आलेले आहे. राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत मंत्री पाटील म्हणाले, रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु नव्हते हा निर्णय न्यायलयाने दिला आहे. याबाबत वाद निर्माण करण्याची गरज नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com