सातारा : नगराध्यक्ष-सरपंच निवड जनतेतून?

पालिकांसह जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्थानिक पातळीवर संभ्रम
satara
satarasakal

सातारा : राज्यातील सत्ता बदलानंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समिती व पालिकांच्या निवडणुकींबाबतही काही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नगराध्यक्ष व सरपंचांची जनतेतून निवड, ‘एक वॉर्ड’चा निर्णय पुन्हा घेतल्यास नव्याने निवडणूक प्रक्रिया घ्यावी लागेल. मात्र, पालिकांची निवडणूक प्रक्रिया आता तिसऱ्या टप्प्यात पोचल्याने यात बदल होण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबतही काही निर्णयात बदल होण्याची शक्यता असल्याच्‍या चर्चेने स्थानिक पातळीवर संभ्रमाचे वातावरण आहे.

कोरोनामुळे मुदतवाढ मिळालेल्या पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची प्रक्रिया सध्या सुरू आहे. कोणत्याही क्षणी आता पालिकांचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोग जाहीर करेल. जिल्हा परिषद व पंचायत समितीची प्रभागरचना अंतिम झाली आहे. आता आरक्षण सोडत निघण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतून पायउतार होऊन शिवसेना (शिंदे गट) व भाजपचे सरकार सत्तेत आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने घेतलेले सर्व निर्णय हे नवे सरकार बदलणार, हे निश्चित मानले जाते.

सध्या जिल्ह्यातील आठ नगरपालिकांच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम लागण्याची चिन्हे आहेत. आजपर्यंत कोरोनासह विविध कारणांनी ही निवडणूक पुढे गेली आहे. राज्यात नवीन सरकार सत्तेत आल्याने त्यांनी पूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार जनतेतून नगराध्यक्ष निवड, जनतेतून सरपंच निवड, एक वॉर्ड संकल्पनेत बदल केले होते. ते महाविकास आघाडी सरकारने बदलले. आता पुन्हा भाजप, शिवसेनेची सत्ता पुन्हा आल्याने ते पूर्वीचे निर्णय पुन्हा घेण्याची शक्यता आहे. पण, सध्या

निवडणुकीची प्रक्रिया ही तिसऱ्या टप्प्यात गेल्याने यामध्ये काही बदल होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे याबाबत जिल्ह्यातील पालिका वर्तुळात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामविकासमंत्रिपद कोणाकडे?

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रभागरचना झालेली आहे. आता आरक्षण सोडत कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण, नव्या सरकारने या निवडणुकीतही काही बदल केल्यास सर्व प्रक्रिया थांबवावी लागेल. त्यामुळे पुन्हा निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. नव्या सरकारच्या निर्णयांकडे सर्वांचे लक्ष लागले असून, ग्रामविकासमंत्रिपद कोणाकडे जाणार? यावर सर्व काही अवलंबून आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com