बाजार समित्यांत शेतकरी समस्या निवारण कक्ष स्थापन करा; रघुनाथराजे निंबाळकरांचा आग्रह

Satara
Satara

फलटण शहर (जि. सातारा) : शेतकरी आत्महत्या रोखण्यासह त्यांच्या समस्यांचे निवारण करून शेतकरी अधिक सक्षम बनविण्यासाठी बाजार समित्यांमध्ये शेतकरी समस्या निवारण कक्ष स्थापन करावा, अशी मागणी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी पणनमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. 

रघुनाथराजे यांच्या निवासस्थानी श्री. देसाई यांनी भेट दिली. त्या वेळी झालेल्या चर्चेत ते बोलत होते. या वेळी आमदार दीपक चव्हाण, पंचायत समिती सदस्य विश्वजितराजे नाईक- निंबाळकर, बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून गेली दोन वर्षे व्यथा निवारण कक्षाद्वारे रचनात्मक काम सुरू असल्याचे निदर्शनास आणून देत रघुनाथराजे म्हणाले, ""वास्तविक शेतकऱ्यांच्या जीवनात पतपुरवठा, खासगी सावकारकी, पोलिस ठाणे, भूमी अभिलेख, महावितरण, महसूल खाते, महिला- विद्यार्थिनींची सुरक्षितता, शेतकऱ्यांच्या मुलांना करिअर मार्गदर्शन, कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे दर न देणे, दुधाला भाव न मिळणे या सारख्या व जवानांच्या घरच्यांना मदत, पेन्शनबाबत, पशुधन समस्या यासारख्या असंख्य प्रश्न अथवा समस्यांच्या सोडवणुकीसाठी निवारण केंद्राची गरज अत्यावश्‍यक आहे. त्यामुळे शेतकरी हा केंद्रबिंदू मानून बाजार समित्यांनी हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविल्यास शेतकरी समस्या निवारण कक्ष हे शेतकऱ्यांसाठी हक्काच व्यासपीठ बनतील.'' याविषयाचे निवेदनही रघुनाथराजे यांनी देसाई यांना दिले. 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com