सातारा : कृषी विभागालाच चिंता खत टंचाईची

बफर स्टॉक असूनही ऐनवेळी तुटवड्याची भीती
Satara Fertilizer shortage scarcity of agriculture department
Satara Fertilizer shortage scarcity of agriculture departmentsakal

सातारा : प्रत्येक वर्षी खरीप हंगामाच्या तोंडावर खतांच्या टंचाईला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. यावर्षी तर रशिया- युक्रेनच्या युद्धाची झळ सर्व क्षेत्रांना बसली असून, यामध्ये खतांचाही समावेश आहे. त्यामुळे खरिपात निर्माण होणारी खतांची समस्या रोखण्यासाठी कृषी विभागाने युरिया व डीएपीचा बफर स्टॉक करण्यावर भर दिला आहे. खतांची कमतरता खरोखरच भासू लागल्यास हा बफर स्टॉक खुला केला जाणार आहे. तरीही खतांची टंचाई भासण्याची भीती कृषी विभागाला आहे.

प्रत्येक वर्षी खरीप हंगामात खते व बियाण्याची काही प्रमाणात टंचाई भासतच असते. त्यावर राज्य सरकार काही ना काही उपाययोजना करते. यावर्षी खतांची कमतरता भासण्याची भीती व्यक्त होत आहे. जिल्ह्याला एक लाख २३ हजार टन खतांचे आवंटन मिळते.

पण, मागणी वाढत असल्याने खतांची कमतरता भासते. त्यावर पर्याय म्हणून कृषी विभाग काही ठराव खतांचा बफर स्टॉक करते. त्यानुसार युरिया व डीएपीची मागणी मोठ्या प्रमाणात असते. त्यासाठी तीन हजार मेट्रिक टन युरियाचा बफर स्टॉक केला जाणार आहे. त्यापैकी दोन हजार मेट्रिक टन युरियाचा साठा केला आहे. तर डीएपी पाच हजार मेट्रिक टन लागते.

त्यापैकी एक हजार हजार मेट्रिक टन साठा केला जाणार आहे. तरीही खरीप पेरणीवेळी मागणी वाढल्यास खतांची कमतरता भासण्याची भीती कृषी विभागाकडूनच व्यक्त होत आहे. त्यामुळे खतांचा पुरेसा साठा उपलब्ध न झाल्यास विक्रेत्यांकडून जादा दराने विक्री होण्याची भीती आहे. यातून शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी विभाग आतापासूनच सक्रिय झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com