`हा` नेता म्हणताे... भाजपमुळेच शेती पाणीप्रश्न सुटला

khatav
khatav

वडूज (जि. सातारा) : मायणी (ता. खटाव) परिसराचा शेती पाणीप्रश्न सोडविण्यासाठी राज्यातील तत्कालीन भारतीय जनता पक्षाच्या राज्यकर्त्यांकडे शासनस्तरावर पाठपुरावा केला. या पाठपुराव्याची फलनिष्पत्ती होऊ लागली असून परिसराचा शेती पाणीप्रश्न सुटण्यास चालना मिळू लागली आहे, असे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी सांगितले. 

तारळी योजनेचे पाणी मायणी (ता. खटाव) येथील पडळकर तलाव, माळीनगर तलाव व खडकाचा मळा तलाव येथे पोचले. या पाण्याचे पूजन महिला व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. येळगावकर यांनी ही माहिती दिली. यावेळी युवा नेते सचिन गुदगे, तंटामुक्तीचे अध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, डॉ. उर्मिला येळगावकर, उपसरपंच आनंदराव शेवाळे, महादेव ढवळे, नितीन पडळकर, अभिजित काबुगडे, मानसी तोरो, रेणू येळगावकर, सीता कचरे उपस्थित होते. 

डॉ. येळगावकर म्हणाले, ""तत्कालीन मंत्री आमदार चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुभाष देशमुख, महादेव जानकर यांच्याशी पाणी योजनांसंबंधी चर्चा झाली होती. धोंडेवाडी उड्डाणपुलाचे काम बंद होते. या संदर्भात आपण मंत्री महोदयांना कल्पना दिली तसेच हरणाई सूतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांनीही तत्कालीन पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या माध्यमातून चांगला पाठपुरावा केला.'' राजू कचरे यांनी सूत्रसंचालन केले. मोहन दगडे यांनी आभार मानले. 


मायणी परिसराला उरमोडी, तारळीचे पाणी मिळावे, ही भाऊसाहेब गुदगेंची तळमळ होती. डॉ. येळगावकर यांच्या पाठपुराव्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण झाली. 

- सचिन गुदगे, युवा नेत 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com