Satara : महाराष्ट्रात नरेंद्र मोदींच्या विचारांचे लोक सत्तेत आले आहेत : आमदार पाटील

फॉक्सकॉन वेदांता प्रकल्पाने महाराष्ट्राला प्राधान्य दिले असतानाही तो प्रकल्प गुजरातला हलवण्यात आला
satara
satarasakal

कऱ्हाड : महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांच्या विचारांचे लोक सत्तेत आले आहेत. त्या लोकांचा ओढा गुजरातकडे आहे. त्यामुळे फॉक्सकॉन वेदांता प्रकल्पाने महाराष्ट्राला प्राधान्य दिले असतानाही तो प्रकल्प गुजरातला हलवण्यात आला. हा प्रकल्प राज्यातून गेल्यामुळे महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे असा आरोप माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

येथील विश्रामगृहात आय़ोजीत पत्रकार परिषदेत आमदार पाटील बोलत होते. ते म्हणाले, फॉक्सकॉन वेदांता हा मोठा प्रकल्प राज्यात होऊ घातला होता. या प्रकल्पामुळे रोजगार तर मिळणार होताच शिवाय राज्याच्या विकासात भर पडणार होती. वेदांचा प्रकल्पाने सर्च रीपोर्ट घडला त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राला प्राधान्य दिले होते. राज्य सरकारने त्यांना मोठ्या सवलती दिल्या होत्या. मात्र सरकार बदलल्यानंतर बरेच निर्णय रद्द करण्यात आले. अनेक कंपन्याही राज्यातून पळवण्यात आल्या. दोन महिन्यात असे काय घडले की हा प्रकल्प राज्यातून गेला आणि तो ही गुजरातलाच का गेला? महाराष्ट्रात नरेंद्र मोदी विचारांचे लोक सत्तेत आले आहेत. या लोकांचा गुजरातकडे ओढा आहे. त्यामुळे तो प्रकल्प गुजरातला गेला.

शासन गाफील राहिले. त्याचा फायदा उचलत हा प्रकल्प गुजरातला हलवण्यात आला. महाराष्ट्राला अन्य प्रकल्प देण्यात येतील असे सांगण्यात येत आहे, मात्र राज्यातुन हा प्रकल्प का गेला हा प्रश्न आहे. राज्यात सत्ता बदल होऊन दोन महिने उलटले तरी अजूनही पालकमंत्र्यांची नेमणूक झालेली नाही. मंत्रिमंडळ विस्तारही झालेला नाही. सण, उत्सव झालेच पाहिजेत पण विकास कामाकडेही या सरकारने प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. मी पहिल्यांदा आमदार म्हणुन निवडुण गेलो त्यावेळी होणारी भाषणे आणि सध्याची भाषणे यात तफावत आहे. विधीमंडळात चर्चा हे कायद्यावर होणे आवश्यक आहे. ती चर्चा अलिकडच्या काळात कमी प्रमाणात होत आहे.

राणेंला भाजपला पुरक बोलताहेत

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या टिकेच्या प्रश्नावर आमदार पाटील म्हणाले, टीका करणे सोपे असते. नारायण राणे हे सुरुवातीला शिवसेनेमध्ये होते. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले आणि आता भाजपमध्ये आहेत. त्यामुळे पक्षाला पूरक असलेले ते बोलत आहेत. उध्दव ठाकरे यांच्यावर त्यांचा राग दिसतोय म्हणून ते अशी टीका करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com