भूकंपामुळे बदलतेय भूस्तर रचना 

भूकंपामुळे बदलतेय भूस्तर रचना 
भूकंपामुळे बदलतेय भूस्तर रचना 

सिंगापूर : अंदमान ते सुमात्रा भागात 2012 मध्ये झालेल्या मोठ्या भूकंपामुळे हिंदी महासागराच्या तळामध्ये नवी भेग निर्माण होत असल्याची शक्‍यता भूशास्त्रज्ञांनी वर्तविली आहे. या नव्या भेगेमुळे भूस्तर रचना बदलून आणखी भूकंप येण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 


सिंगापूर येथील नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठ आणि इंडोनेशियातील विज्ञान संस्थेतील शास्त्रज्ञांनी याबाबत संशोधन केले असून हिंदी महासागरातील व्हॉर्टोन खोऱ्यातील तळाशी नवी भेग पडत असल्याचे पुुरावे त्यांना मिळाले आहेत. दोन भूस्तरांचे एकमेकांवर घर्षण होऊन भूकंप होतात. संबंधित भूस्तराची सीमा असणाऱ्या भेगेपासून दूर भूस्तरामध्ये हालचाल झाल्याने दबाव वाढून हे घर्षण होते. यामुळे दोन्ही भूस्तरांमध्ये प्रचंड भूकंप निर्माण होऊन नवी भेग निर्माण होण्याची शक्‍यता असते. या नव्या भेगेमुळे आणखी भूकंप निर्माण होऊ शकतात.

हाच प्रकार 2012 मध्ये झाला असण्याची शक्‍यता शास्त्रज्ञांना वाटत आहे. अंदमान-सुमात्रा भागात झालेल्या या भूकंपाआधीची आणि नंतरची भूकंपाबाबतची माहिती शास्त्रज्ञांनी गोळा केली. तसेच, खोल समुद्रात मोहीम राबवीत तळाचा अभ्यास केला. सुमात्राच्या किनाऱ्याजवळ नवी भेग निर्माण होत असल्याचा निष्कर्ष या अभ्यासाअंती काढण्यात आला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com