Read Latest & Breaking Minister Varsha Gaikwad Marathi News. Get Trending & Top News Headlines on Minister Varsha Gaikwad along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal
कोरोनामुळे मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा बंद होत्या. तीन वर्षांत त्या वर्गातील मुले केवळ ६० दिवसच शाळेत गेली. बहुतेक मुले शिक्षणापासून दूरच राहिली. घराजवळील अंगणवाड्यांमध्ये शिकत असलेली चिमुकली आता थेट पहिली, दुसरीच्या शाळेत गेली आहेत.
मागील काही वर्षांत बहुतेक मुलांचा कल विज्ञान व वाणिज्य शाखेकडे असल्याने कला शाखेच्या अनेक तुकड्या बंद पडल्या आहेत. ग्रामीण तथा तालुक्याच्या ठिकाणच्या महाविद्यालयांना एटीकेटीचे विद्यार्थी घेऊन तुकडीची पटसंख्या पूर्ण करावी लागत आहे.
शाळेची वेळ सकाळी १० ते सायंकाळी साडेपाचपर्यंत असून, शनिवारी सकाळी आठ वाजता शाळा भरते. मात्र, शिक्षक वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांची पंचाईत होते. या पार्श्वभूमीवर आता सर्व शिक्षकांनी शाळा भरण्यापूर्वी अर्धा तास अगोदर शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक आहे, असे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिले आहेत.
पेनूर येथील जिल्हा परिषदेच्या दोन शाळांमधील लेटकमर शिक्षक व वार्षिक नियोजन नाही, पाठ्यपुस्तके अस्ताव्यस्त पडलेली, परिसर अस्वच्छता, अशा कारणांमुळे एका मुख्याध्यापकासह १५ शिक्षकांची एक दिवसांची पगार कपात करण्याची कारवाई शिक्षणाधिकाऱ्यांनी केली.
यंदाच्या शैक्षणिक वर्षातील शाळांची पहिली घंटा उद्या (बुधवारी) वाजणार आहे. पहिल्या दिवशी मुलांचे औक्षण करून गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले जाणार आहे. पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे.
कोरोनामुळे सलग दोन वर्षे (२३ महिने) शाळा विशेषत: पहिली ते चौथीचे वर्ग पूर्णत: बंद राहिले. त्या मुलांना ऑनलाइन शिक्षणदेखील समजले नाही आणि घरीही त्यांनी नवीन शैक्षणिक वर्षाचा अभ्यास केला नाही.
कोरोनामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला, घरात आई आजारी आहे, बहिण लग्नाला आली आहे, तिला चांगला पती मिळावा, विवाहातील सर्व वस्तू देता याव्यात, पालकांना हातभार लागेल म्हणून मला काम करावे लागत असल्याची ह्दयद्रावक कहाणी एका चायनिज गाड्यावर काम करणाऱ्या १४ वर्षीय मुलाने सांगितली.
जिल्ह्यातील शाळा १३ जूनपासून सुरू होणार आहेत; पण पहिल्या दोन दिवसांत शिक्षकांनी शाळांमध्ये जाऊन शाळांची संपूर्ण स्वच्छता व वर्गखोल्यांमध्ये सॅनिटायझर फवारायचे आहे. १५ जूनपासून मुलांना शाळेत बोलावले जाणार असून, शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व मुलांना गणवेश व पाठ्यपुस्तके द्यायची आहेत.
शाळा बंद केल्यास विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे शाळा बंद न ठेवता १२ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणावर भर दिला जाणार आहे. तर पावसाळ्याचे दिवस आणि कोरोनावाढीमुळे शाळेची वेळ कमी करून विज्ञान, गणित व इंग्रजी या विषयांवरच सर्वाधिक फोकस केला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पहिली ते पाचवीतील मुलांना अजूनही देशाचा स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन कधी असतो, हे सुद्धा सांगता येत नसल्याची स्थिती आहे. प्राथमिक शाळांमधील मुलांची गुणवत्ता वाढावी, कोरोना काळातील मुलांचे शैक्षणिक नुकसान भरून काढून सर्व विद्यार्थी स्पर्धाक्षम बनावेत, या हेतूने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी त्याचा कृती आराखडा तयार केला आहे.
७ जूनला बारावीचा निकाल जाहीर होऊ शकतो. पण, बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी त्याबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे. शिक्षणमंत्री स्वत: तारीख जाहीर करतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, दहावीच्या मुलांची चित्रकलेची परीक्षा उशिरा झाल्याने त्यांचा निकाल २० जूनपर्यंत लागू शकतो, अशी माहिती बोर्डातील अधिकाऱ्यांनी दिली.
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी ग्रामविकास विभागाने एक आदेश काढला आहे. त्यानुसार ज्या जिल्हा परिषदांमधील शिक्षकांची रिक्त पदे १० टक्क्यांपेक्षा अधिक आहेत, त्यांच्यासह दहा टक्क्यांपेक्षा अधिक रिक्तपदे असलेल्या जिल्हा परिषदांनाही आंतरजिल्हा बदलीत सहभागी करून घेतले जाणार आहे.
कोरोना काळात सलग दोन वर्षे विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पध्दतीने घेण्यात आल्या. त्यात सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव्ह) होते. एका तासात त्यांना तो पेपर सोडवावा लागला. त्यानंतर शिक्षणही ऑनलाइन मिळाले. लिखाणाचा सराव मोडलेल्या विद्यार्थ्यांना आता दोन वर्षानंतर पहिल्यांदाच ऑफलाइन परीक्षा द्यावी लागत आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.