अजिंठा लेणी; अद्भुत कलाविष्कार

अजिंठा लेणी; अद्भुत कलाविष्कार

औरंगाबाद जिल्ह्यात  इ.स. पूर्व दुसरे शतक ते इ.स. चौथे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात कोरलेल्या २९  बौद्ध  लेणी आहेत.  औरंगाबाद शहरापासून १०० ते ११० कि.मी. अंतरावर वाघूर नदीच्या परिसराशेजारी या लेण्या असून, त्या नदीपात्रापासून १५-३० मीटर  उंचीवर विस्तीर्ण डोंगररांगांमधील कातळांवर कोरल्या आहेत. बौद्ध धर्माचा वारसा जतन करणारी प्रदीर्घ ऐतिहासिक कालखंडाची पार्श्वभूमी लाभलेल्या अजिंठा लेणी भारताची आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी ठळक ओळख करून देणाऱ्या महत्त्वाच्या लेण्या आहेत. भारताच्या केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या प्रतिष्ठित पर्यटन स्थळ प्रकल्पात देशातील १२ पर्यटन स्थळांची निवड करण्यात आली असून, महाराष्ट्रातील अजिंठा व  वेरूळच्या लेण्यांचा  या यादीत समावेश आहे. अजिंठा लेणी जागतिक वारसास्थान  म्हणून  ‘युनेस्को’ने  १९८३ मध्ये घोषित केल्यास आणि या लेण्यांना भारतातील पहिल्या जागतिक वारसास्थळाचा मान आहे. जून २०१३मध्ये  महाराष्ट्राच्या सात आश्चर्यांची  घोषणा करण्यात आली, त्यात अजिंठा लेणी हे प्रमुख आश्चर्य ठरले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अजिंठा लेण्यांत  गौतम बुद्धांच्या विविध भावमुद्रा तसेच  बौद्ध तत्त्वज्ञानाला चित्रशिल्प रूपात व्यक्त करणाऱ्या शिल्पकलेचा अद्वितीय आविष्कार पाहायला मिळतो. अजिंठा लेणी देशी पर्यटकांसोबतच प्रामुख्याने विदेशी पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचे पर्यटनस्थळ आहे. चित्र-शिल्पकलेचा नितांतसुंदर अनुभव देण्याऱ्या या लेण्यांमधून त्या काळात वापरण्यात आलेल्या रंगछटा पाहावयास मिळतात.

अजिंठ्याची निर्मिती करणाऱ्या कलाकारांनी  विहार  आणि चैत्य  अशा दोन प्रकारे लेण्यांची निर्मिती केली आहे.  या लेण्यांमधील भिंती आणि छतांवरील चित्रांमधून भगवान बुद्धांच्या जीवनातील विविध प्रसंग आणि अनेक बौद्ध विभूतींचे चित्रण आढळते. दहाव्या आणि अकराव्या लेण्यातील सातवाहनकालीन चित्रकला पाहून तत्कालीन चित्रकारांचे कौशल्य लक्षात येते. एका चित्रात अनेक लोकांचा समूह चित्रित करण्याची या चित्रकारांची हातोटी विलक्षण आहे. 

या लेण्यांचा शोध  ब्रिटिश भारताच्या मद्रास इलाख्यातील ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ वाघाच्या शिकारीसाठी गेला असताना  २८ एप्रिल  १८१९  रोजी लागला. स्मिथने येथील दहाव्या क्रमांकाच्या लेणीतील एका खांबावर आपले नाव आणि तारीख कोरून ठेवल्याचे आजही अंधुकपणे दिसून येते. पुरातत्त्व शास्त्रीय पुराव्यानुसार या लेणी दोन वेगवेगळ्या कालखंडांत निर्माण केल्या गेल्या. ९, १०, १२, १३ व ‘१५-अ’ या लेण्या  हीनयान कालखंडात कोरल्या गेल्या असाव्यात. हा कालखंड साधारणतः इ.स. पूर्व दुसऱ्या शतकाच्या सुमारास सुरू झाला. या सगळ्या लेण्यांतून बुद्धांचे दर्शन स्तूप-रूपांत होते. या व्यतिरिक्त १ ते २९ क्रमांकांची लेणी साधारणतः ८००-९००  महायान कालखंडात निर्माण केली गेलेली असावीत. या लेण्यांतून बुद्धांचे सर्वसामान्य लोकांस परिचित असे रूप दिसून येते. महायान लेणी  वाकाटक  राजांच्या राजवटीत निर्मिली गेली, त्यामुळे त्यांस बऱ्याचदा वाकाटक लेणी असेही संबोधले जाते.

कसे जाल? 
 औरंगाबादहून बसची व्यवस्था आहे.
 या ठिकाणी एमटीडीसीचे कँटीन असल्याने जेवणाची व्यवस्था आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com