गेल्या काही आठवड्यांपासून भारतातील कोरोना रुग्णवाढीची निंयत्रणात आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन पुन्हा सुरू करण्याचा विचार सरकार करत आहेत. यासंबधीत माहिती असणाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, येत्या 10 दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटनाबाबत सरकारची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
देशात पहिल्यांदा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर, जवळपास गेल्या दीड वर्षापासून परदेशी पर्यटकांना व्हिसा देण्यात आलेला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केलेल्या वक्तव्यानुसार, सराकार गोव्यामध्ये परदेशी पर्यटकांना प्रवेश देण्याची योजना आखत आहेत. ''येत्या पर्यटन हंगामात पूर्वीप्रमाणेच पर्यटन पुन्हा सुरू होऊ शकते. आम्ही परदेशी पर्यटकांना येथे येण्याची परवानगी देण्याचा विचार करत आहोत. पण, हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण लसीकरणासाठी तेवढे महत्त्व देतो तेवढेच महत्त्व कोरोनाचा प्रादुर्भाव टाळ्ण्यासाठीच्या खबरदारीला द्यायला हवे. हे आपले कर्तव्य आहे.'' असे मत पंतप्रधान मोदी यांनी गोवा आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केले.
भारतीय अर्थव्यवस्था पर्यटनासाठी पुन्हा सुरु करण्यासाठी अपेक्षित तारीख आणि इतर घटकांबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी भागधारकांशी चर्चा करत आहेत
व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या पहिल्या 500,000 पर्यटकांना व्हिसाखर्च माफ करण्याबाबतही चर्चा सुरु आहे. मोफत व्हिसा योजना 31 मार्च 2022 पर्यंत किंवा 500,000चा आकडा ओलांडल्यास लागू होईल. यासाठी 100 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल करावी लागेल अशी माहिती मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने दिली.
मोफत व्हिसा योजनेबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी शनिवारी म्हणाले की, केंद्र सरकार परदेशी पर्यटकांचे परत स्वागत करण्यासाठी पावले उचलत आहे.
''मार्च 2020 म्हणजे, जेव्हा पहिल्या देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्यापासून कोरोनामुळे फटका बसलेले पर्यटन, हॉस्पिटॅलिटी आणि विमानचालन क्षेत्राच्या पुनरुज्जीवन करण्यात मदत होई, असे अधिकाऱ्याने सांगितले.
एका महिन्याच्या ई टुरिस्ट व्हिसाची देशानुसार असून साधारण 25 डॉलर( 1842 रुपये) आहे. तर वर्षाच्या एकापेक्षाजास्त प्रवेशाच्या पर्यटन व्हिसासाठी शुल्काची किंमत 40 डॉलर(अंदाजे 3000 रुपये) आहे.
परदेश प्रवासाच्या अटींवरही विचार केला जात आहे अशी माहिती संबधित अधिकाऱ्यांने असेही सांगितले. दोन्ही लसीकरणाचे डोस घेतलेल्यांनाच व्हिसा द्यावा का?अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव असेलेल्या देशांतील पर्यटकांना प्रतिबंधित करावे का? यावर विचार सुरु आहे.
मार्च 2020 पासून भारतातील सर्व नियोजित आंतरराष्ट्रीय उड्डाणे निलंबित करण्यात आली आहेत परंतु द्विपक्षीय 'एअर बबल" व्यवस्थेअंतर्गत विशेष उड्डाणे सुरु आहेत.
याबाबत बोलताना दुसऱ्या अधिकाऱ्याने संकेत दिले की, परदेशी पर्यटन पुन्हा सुरू करणे टप्प्याटप्प्याने केले जाऊ शकते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.