अन्न व्यावसायिकांनो कायदा पाळा, कारवाई टाळा!; अन्न व सुरक्षा विभागाचे आवाहन 

food sellers
food sellers

नाशिक/सातपूर : कोरोनाकाळात अनेक कंपन्या बंद झाल्याने कामगारांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे रस्त्यावर अन्नपदार्थांच्या विक्रीचा व्यवसाय वाढला आहे. याबाबत त्यांना शासनाच्या इतर सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी परवाना अथवा नोंदणी करण्याचे आवाहन अन्न व सुरक्षा विभागाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंखे यांनी बुधवारी (ता. २०) पत्रकार परिषदेत केले. 

लॉकडाउन काळात उदरनिर्वाहचे साधन म्हणून बहुतांश जण अन्नपदार्थांच्या व्यवसायाकडे वळले आहेत. घरगुती अन्‍नपदार्थ तयार करणारे, चहा, नाश्ता, डबे, भाजीपाला आदींची विक्री सुरू केली आहे. नवीन अन्नव्यवसाय करताना अन्नसुरक्षा व मानदे कायद्यानुसार परवाना किंवा नोंदणी करणे आवश्यक आहे. हे सर्व व्यावसायिक नवीन असल्याने व त्यांना याबद्दल माहिती नसल्याने ते नोंदणी न करता व्यवसाय करीत आहेत. प्रशासनाच्या विशेष मोहिमेनुसार अन्न व्यावसायिकांना भेटी दिल्या असता, त्यांच्या मनात प्रचंड भीती असल्याचे जाणवले. ही बाब त्यांच्यावर जबरदस्तीने लादली जाते, अशी त्यांची भावना होत असल्याचे प्रकर्षाने जाणवले. सर्व व्यावसायिकांनी चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन नोंदणी व परवाना घ्यावा. जर घाऊक विक्रेता, वितरकांनी विनानोंदणी, परवानाधारकांना अन्नपदार्थांची विक्री केल्यास कायद्याचे उल्लंघन होईल व हा गुन्हा दंडास पात्र राहील, असा इशारा सहआयुक्त साळुंखे यांनी दिला. 

सतरा हजारांचा दंड 

गेल्या चार दिवसांत ३६ मिठाई दुकानांची तपासणी करून त्यामध्ये ६ जणांवर कारवाई करत १७ हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. २३ रस्त्यांवर व्यावसायिकांकडून एक लाखाचा दंड वसूल केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com