दारणेकाठच्या गावात दूषित पाण्याबाबत टोलवाटोलवी

MUE20A00055_pr.jpg
MUE20A00055_pr.jpg

नाशिक : पाणीपुरवठा विभागाने सकाळ मध्ये देवळे (ता. इगतपुरी) दूषित पाण्यामुळे साथीच्या आजाराबाबत बातमी प्रसिध्द झाल्यानंतर त्याची दखल घेत, पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता अजित सूर्यवंशी  व संबंधित अधिकाऱ्यांनी आणि ग्रामपंचायत देवळे (ता. इगतपुरी) येथील सरपंच ज्ञानेश्वर उघडे, ग्रामसेवक तुषार  रजपूत यांनी विहिरीची पाहणी केली. मात्र, पाहणीनंतर या विषयावरून ग्रामपंचायत आणि पाणीपुरवठा विभागाने हात  झटकून याप्रश्नी जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ग्रामस्थांची अडचण मात्र कायम आहे.

दूषित पाण्याबाबत ग्रामपंचायतीने लक्ष घालावे

पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता अजित सुर्यवंशी यांनी पाणी योजनेला तीन वर्षाहून अधिक कालावधी झाला आहे. शासन निर्णय २०११ नुसार तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असल्यास योजना आहे त्या स्थितीत बंद करून ग्रामपंचायतीने हस्तांतरित करावी. त्यानंतर उर्वरित कामाचे मूल्यांकन करून जिल्हा परिषदेकडे वर्ग करावी. असा नियम असल्याने दूषित पाण्याबाबत ग्रामपंचायतीने लक्ष घालावे अशी मागणी केली.

अपूर्ण योजना ताब्यात का  
तर, विहिरीचे व टाकीचे काम हे अर्धवट असल्याने आम्ही ती ताब्यात घेतली नसल्याने दुरुस्ती व कोणतीही उपाययोजना करू शकत नाही आणि जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही योजना ताब्यात घेणार नाही. असे सरपंचज्ञानेश्वर उघडे यांनी म्हटले आहे.

पाण्यासाठी पायपीट 
नळाला गढूळ पाणी येत असल्याने महिलांना घोटी-सिन्नर हा वर्दळीचा मार्ग ओलांडून अर्धा ते एक किलोमीटर दूर जाऊन हातपंपावरून 
पाणी आणावे लागते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला चिखल असल्याने रस्त्यावर चालताना अतिशय भीती वाटते. मात्र, पाणी गरजेचे असल्याने जीव धोक्यात घालावा लागतो. यात अडचण महिलांचीच सुरु असल्याचे पंचायत समिती सदस्य -विमल तोकडे यांनी
सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com