जळीत ऊस शेतीची महावितरणकडून लवकरच नुकसानभरपाई; आमदार बोरसे यांचे आश्वासन

Burnt sugarcane fields
Burnt sugarcane fields

नाशिक/डांगसौंदाणे :डांगसौंदाणे येथील शेतकरी दिगंबर धर्मा बोरसे यांचा सात एकर ऊस आणि ठिबक सिंचन, तर वंदना साहेबराव काकुळते यांचा दोन एकर ऊस ४ नोव्हेंबरला जळून खाक झाला आहे. यामध्ये या दोन्ही शेतकऱ्यांचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

महावितरण कंपनीच्या चुकीमुळे डांगसौंदाणे येथील दोन शेतकऱ्यांचा एकूण नऊ एकर ऊस जळून खाक झाला आहे. या जळीत ऊस शेतीची आमदार दिलीप बोरसे यांनी पाहणी केली. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महावितरण कंपनीकडून लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. 

शेतकऱ्यांचे २० लाख रुपयांचे नुकसान

या जळीत उसाचा पंचनामा करून आठ दिवस उलटलेत; मात्र अद्याप कुठलीही नुकसानभरपाई या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मिळाली नाही. बुधवारी (ता. ११) आमदार बोरसे यांनी पाहणी केली. शिवाय या घटनेविषयी शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. घटनेला पूर्णपणे महावितरण जबाबदार आहे. नुकसानग्रस्त शेतकरी त्यांच्या शेतातील कामासंदर्भात २०१८ पासून महावितरण कंपनीच्या डांगसौंदाणे कार्यालयाशी पाठपुरावा करत होते; मात्र महावितरण कंपनीच्या स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या कामाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ही घटना घडल्याचे समोर आले आहे. 

दरम्यान, विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून या घटनेचा चौकशी अहवाल आल्यानंतर या घटनेला जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होईल, असे आमदार बोरसे यांनी या वेळी स्पष्ट केले. या वेळी बुंधाटे उपसरपंच नंदू बैरागी, हेमंत चंद्रात्रे, साहेबराव काकुळते, दिगंबर बोरसे आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com