रेशन कमी...आणि मनस्तापच जास्त..चकरा मारूनच नागरिक हैराण!

ration
ration

नाशिक रोड :  लॉकडाउनदरम्यान अन्नाचा तुटवडा भासल्यानंतर रेशनच्या पुरवठ्यासाठी नागरिकांच्या चकरा वाढल्या आहेत. इतके दिवस तुम्ही रेशनच न घेतल्याने कार्ड पुन्हा ऍक्‍टिव्ह करावे लागेल, या सबबीखाली अनेकांना परत पाठविले जाते.

नाशिक रोड कार्यालयात अडचणी सोडविताना नागरिक हैराण  

पहिल्या चकरेत एकाचेही काम होत नाही. ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही अथवा तांत्रिक अडचणींमुळे रेशनकार्डचा वापर झाला नाही, अशांची रेशनकार्डासाठी नाशिक रोड येथील धान्यपुरवठा अधिकारी कार्यालयाबाहेर कायम गर्दी असते. नावात बदल करणे, पत्ता बदलणे, दुकान बदलणे, नाव कमी करणे, नाव समाविष्ट करणे, नवीन रेशनकार्ड काढणे या कामांसाठी नागरिकांना तारीख पे तारीख मिळत असून, तीन-तीन महिने कामे होत नसल्याची उदाहरणे आहेत. 

७० हजार कार्ड धारकांना धान्य दिल्याचा दावा 

नाशिक शहरात एक लाख कार्डे असून, एपीएलधारक 50 हजार आहेत. शहरातल्या 70 हजार लोकांना धान्यपुरवठा केल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. सध्या नवीन रेशनकार्ड काढणे, नाव कमी करणे, तसेच नाव वाढवणे, धान्य मिळण्यासाठी अर्ज करणे, दुय्यम कार्ड नियमित करणे अशा गोष्टींसाठी स्वतंत्र धान्यपुरवठा अधिकारी नेमण्याची गरज निर्माण झाली आहे. 

येथे आल्यावर तारखाच दिल्या जातात, काम वेळेवर होत नाही. एका कामाला अगदी सहा महिने लागतात म्हणून शासनाने जलदगतीने काम होईल याची व्यवस्था करायला हवी. -नरेश इंगोले, रेशनकार्डधारक 

नागरिकांना कार्ड काढणे सोयीस्कर व्हावे म्हणून बाहेर बोर्ड लावलेले आहेत. नागरिकांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी एका दिवसात काम होईल याची व्यवस्था करण्यात आली आहे. -श्‍वेता पाटोळे, धान्य वितरण अधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com