शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर अक्षरश: पाणी.. का आली कांदाचाळी फोडण्याची वेळ?

onion farmers.jpg
onion farmers.jpg

नाशिक / देवळा : चाळीत साठवलेला उन्हाळ कांदा या वर्षी जुलैमध्येच खराब होऊ लागल्याने शेतकऱ्यांना दोन-अडीच महिन्यांतच चाळी फोडण्याची वेळ आली आहे. चाळीतील इतर कांदा खराब होऊ नये म्हणून भाव कमी असतानाही शेतकऱ्यांना नाइलाजास्तव कांदाविक्री करावी लागत आहे. यामुळे भाववाढ झाल्यावर कांदा विकू या स्वप्नावर पाणी फिरणार आहे. 

शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर अक्षरश: पाणी
येथील कसमादे भागात मोठ्या प्रमाणात कांदा पिकवला जातो. गेल्या वर्षी चाळीतील कांदा असाच फेकावा लागला. या वर्षी निश्‍चित कांद्याला भाव राहील, या आशेने शेतकऱ्यांनी कांदाचाळी भरून ठेवल्या असल्या तरी भऊर, विठेवाडी, सावकी तसेच कळवण तालुक्‍यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चाळीतील कांदा सडू लागला आहे. काही चाळीतून अक्षरशः काळे पाणी वाहत आहे. यामुळे चाळीतून कांदा बाहेर काढताना शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी येत आहे. खराब झालेला कांदा बाजूला काढत चांगला कांदा निवडून तो विकण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. आज ना उद्या या कांद्याचे भाव वाढतील, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. पण आता कांदा खराब होण्यापेक्षा मिळेल त्या किमतीत विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. 

हमीभाव देऊन शेतकऱ्यांचे दु:ख कमी करा
उन्हाळ कांदा लागवडीपासून काढणी, साठवणूक यासाठी मोठा खर्च केला. यंदा चांगले उत्पादन निघाले. परंतु सततच्या कोसळत्या बाजारभावाने आर्थिक गणित बिघडले आहे. साठवलेला कांदा आज सडत चालला आहे. तसेच वजनातही मोठी घट होत आहे. त्यामुळे सरकारने कांद्याला हमीभाव देऊन शेतकऱ्यांचे दु:ख कमी करावे. - बाबूराव पवार, शेतकरी, भऊर, ता. देवळा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com