नाशिक : (लासलगाव) येथील मध्य रेल्वेच्या स्थानकातून इतका टन कांदा बांगलादेशात जाण्यासाठी मालगाडीत लोड केला जात आहे. येणाऱ्या दिवसांत अशी निर्यात सुरू राहिल्यास कोसळते कांद्याचे बाजारभाव स्थिर राहण्यासाठी मदत मिळणार आहे. कांद्याला 500 पासून 900 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने मिळणाऱ्या दरातून शेतकऱ्यांचा झालेला खर्च निघत नसल्याची स्थिती आहे. अशात कांद्याची निर्यात जोमाने झाल्यास समाधानकारक भाव मिळेल, अशी अपेक्षा आहे.
बांगलादेशातून अचानक कांद्याची मागणी
भारतासह जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातल्याने देशासह जागतिक बाजारपेठेत कांद्याची मागणी घटल्याने कांद्याचे बाजारभाव एक हजाराच्या आत आल्याने कांदा उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात "नाफेड'मार्फत केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाने ग्राहकांच्या हितासाठी 50 हजार टन कांद्याची खरेदी सुरू केली आहे. मात्र, कांद्याच्या बाजारभावात कुठलेही मोठी वाढ झालेली नाही. त्यात बांगलादेशातून अचानक कांद्याची मागणी वाढल्याने कोलकता येथील व्यापाऱ्यांनी एक हजार 750 टन कांदा विकत घेतला.
मात्र हमाल आणि ट्रक न मिळाल्याने व्यापाऱ्यांच्या गुदामात तो पडून होता. आता ट्रक आणि हमाल उपलब्ध झाल्याने लासलगावसह नाशिक जिल्ह्यांतून विकत घेतला असून, तो कांदा मध्य रेल्वेच्या लासलगाव, निफाड, खरेवाडी, मनमाड आणि नांदगाव या पाच स्थानकांतून मालगाडीत लोड केला जात आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.