मुसळधार पावसाचा डाळींबाला फटका 

rain.jpg
rain.jpg


नाशिक/ अंबासन : काटवन परिसरातील राहुड या दुष्काळी भागात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची अक्षरश: झोप उडाली आहे. शुक्रवारी (ता.3) सायंकाळी पाचच्या सुमारास मुसळधारेमुळे शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. अनेक शेतकऱ्यांनी महागडे कांदा बियाणे घेऊन वाफ्यात टाकले होते. तर बहुतांश शेतकऱ्यांनी बाजरी व मक्‍याची पेरणी केली होती.

काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने शेततील उतरलेले बियाणे झोडपल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा दुबार पेरणी केली होती. तसेच हजारो रूपये खर्च करून घेतलेले कांदा बियाणे घेणे आता मुश्‍किल झाल्याचे शेतकरी सांगतात. अनेक डाळींब उत्पादकांच्या बागांतील डाळींब काढणीला आले मात्र मुसळधार पावसाचे पाणी साचल्यामुळे डाळींब झाडावरच सोडण्याची वेळ आल्याचे डाळींब उत्पादक अशोक ठाकरे यांनी सांगितले. 


पावसामुळे संपूर्ण शेतात साचलेले पाणी काढण्यासाठी शेतकरी भर पावसात आटापिटा करीत होते. तर बऱ्याचशा शेतीत पाणी साचल्याने उगवलेली कोवळी पिके सडून वाया जाणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. दुबार पेरणीनंतरही पावसामुळे पुन्हा पेरणी करणे जिकरीचे ठरत असून पेरणी करावी की नाही या विवंचनेत शेतकरी सापडले आहेत. पावसाच्या या फटक्‍याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून संबधित विभागाने शेतकऱ्यांना उभारीसाठी लक्ष घालावे, अशी मागणी स्थानिक शेतकरी करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com