इगतपुरीत मुसळधारेने भातपिके आडवी; अस्मानी संकटाने शेतकरी हवालदिल 

ghoti paus.jpg
ghoti paus.jpg

नाशिक / घोटी : इगतपुरीच्या पूर्व व मध्य भागात बुधवारी (ता. १४) मध्यरात्री मुसळधारेने हजेरी लावल्याने काढणीला आलेल्या भातपिकांचे नुकसान झाले. तुडतुड्या व पंधरा टाका रोगाने आधीच मेटाकुटीला आलेले शेतकरी आता वादळी पावसाने हवालदिल झाले आहेत. जागोजागी शेताशेतांतून भातपिके पडल्याचे चित्र दिसत आहे. 

किडीचा प्रादुर्भाव, आस्मानी संकटाने शेतकरी हवालदिल
हंगामातील वर्षात यंदा तालुक्यात २८ हजार सातशे हेक्टरवर भातलागवड करण्यात आली. यातून सरासरी उत्पन्न दोन लाख ८०० क्विंटल भात उत्पादन निघणार होते. मात्र विविध रोगांनी व आस्मानी संकटाने उत्पादनात घट होणार आहे. भातपिकांसाठी लावलेल्या भागभांडवलासह मजुरी व खत-बियाणे यांचा खर्च निघणार नसल्याने शेतकरी चिंतातूर आहे. तालुक्याच्या पूर्व व मध्य भागात पावसाने थैमान घातल्याने नदी-नाले दुथडी वाहत आहे. मात्र शेतात प्रचंड प्रमाणात पाणी साचले आहे. जनावरांचा हिरवा चारादेखील कुजण्याच्या मार्गावर आहे. भातपिकांचे पंचनामे तातडीने करण्यासाठी खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर यांच्यासह विविध शेतकरी संघटनांनी मागणी करत गावोगावी भेटी देत नुकसानभरपाईची मागणी केली.

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com