उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीचा हवामानचा अंदाज...पावसाच्या उघडीपमुळे बळीराजाला धास्ती 

rain.jpg
rain.jpg

नाशिक  : मुंबई आणि ठाणे जिल्ह्याच्या किनारपट्टीवर छोटेसे चक्रीवादळ तयार होत असल्याने हा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार शनिवारी आणि रविवारी दोनशेहून अधिक मिलिमीटर पाऊस होणार होता. मात्र चक्रीवादळ फारसे मोठे तयार होण्याची चिन्हे मावळल्याने पावसाचे प्रमाण कमी झाल्याचे मानले जात आहे. या दोन दिवसांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी 15 ते 20 किलोमीटर राहण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

निसर्ग वादळावेळी ताशी 50 ते 60 किलोमीटर असा वाऱ्याचा वेग राहिला होता. 4 जूनला सकाळी आठला संपलेल्या 24 तासांत तालुकानिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा ः नाशिक- 64, इगतपुरी- 106, दिंडोरी- 70, पेठ- 28, त्र्यंबकेश्‍वर- 38, मालेगाव- 72, नांदगाव- 27, चांदवड- 59, कळवण- 71, बागलाण- 87, सुरगाणा- 65.1, देवळा- 87.2, निफाड- 57.2, सिन्नर- 111, येवला- 53. अतिवृष्टीमुळे जिल्ह्याच्या विशेषतः अवर्षणप्रवण क्षेत्रामघ्ये खरिपाच्या पेरण्या उरकत आल्या आहेत. 
 
पावसाच्या उघडीपमुळे धास्ती 
खरिपाच्या पेरण्या झाल्या. पण रोपे तयार झाली असताना पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांमध्ये धास्ती बळावली होती. अशातच, मक्‍यावर लष्करी अळीने थैमान घातल्याने शेतकऱ्यांच्या काळजीत भर पडली. अळी धुऊन जाण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्‍यकता होती. ही गरज काही भागात पावसाने पूर्ण केली आहे. आता येत्या शनिवारी आणि रविवारी चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने त्याचा फायदा खरिपाच्या पिकांना होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com