‘अर्ली’ची ६२ हजार टन द्राक्षे वाया

नाशिक - पावसाच्या दणक्‍यात चक्काचूर झालेली ‘अर्ली’ द्राक्षे
नाशिक - पावसाच्या दणक्‍यात चक्काचूर झालेली ‘अर्ली’ द्राक्षे

नाशिक - बागलाण, मालेगाव, कळवण, देवळा, चांदवडच्या पट्ट्यातील शेतकऱ्यांनी यंदा ग्राहकांसाठी ‘अर्ली’ द्राक्षाचे ६२ हजार टन उत्पादन तयार केले. घड काढणीच्या टप्प्यात असताना अतिपावसाने या हंगामावर पाणी फिरवल्याने संपूर्ण द्राक्षे नष्ट झाली. पावसाच्या माऱ्यामुळे मणी तडकण्याबरोबर अतिवृष्टीमुळे बुरशीजन्य रोगाने घड कुजले आणि सडलेल्या मण्यांचा सडा बागांमध्ये पडला असून, दुर्गंधीची समस्या तयार झाली.

सततच्या पावसामुळे बागांमध्ये पाणी साचल्याने ट्रॅक्‍टर चालवणे अथवा बागेत जाऊन स्वच्छता करणे शेतकऱ्यांना मुश्‍कील बनले. द्राक्षबागांची स्वच्छता करण्यासाठी शेतकऱ्यांना किमान महिनाभराचा कालावधी लागणार आहे.

ट्रॅक्‍टरचे डिझेल, चालकाचे वेतन, मजुरांसाठीची मजुरी या खर्चाचा भुर्दंड नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सहन करावा लागेल. हा खर्च एकरी दहा हजारांहून अधिक होण्याची शक्‍यता आहे.

पावसाच्या आताच्या दणक्‍यात एकही मणी बेदाण्यासाठी अथवा वायनरीसाठी जाण्याची स्थिती उरलेली नाही. एकरी त्यासाठी अडीच लाखांची गुंतवणूक केली होती. 
- केदा भामरे, द्राक्ष उत्पादक, पिंगळवाडे-बागलाण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com