हिंदू राष्ट्रासाठी परिवर्तनाची तयारी करा - व्ही. रवीकुमार अय्यर

हिंदू राष्ट्रासाठी परिवर्तनाची तयारी करा - व्ही. रवीकुमार अय्यर

जळगाव -  संपूर्ण जगात इसाई, इस्लाम, हिंदू व बौद्ध हे सर्वांत मोठे धर्म आहेत. अनेक देशातील लोक आपले पूर्वज आर्य म्हणून असल्याचे सांगून त्यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. काही देशांत हिंदुत्ववादी होण्यासाठी आंदोलन होत आहे. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या  हिंदू राष्ट्र परिवर्तनासाठी सर्वांनी तयारी करून सज्ज राहण्याचे आवाहन व्ही. रवीकुमार अय्यर यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आयोजित बौद्धिक वर्गात ते बोलत होते. 

छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात बौद्धिक वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी  म्हणून ॲड. प्रकाश बी. पाटील होते. व्यासपीठावर रा. स्व. संघाचे केंद्रीय संपर्क सदस्य शरदराव ढोले, जिल्हा सरसंघचालक राजेश पाटील, शहर सरसंघचालक विलास भोळे, प्रांत प्रचारक रामानंद काळे, भवानी मंदिर संस्थानचे महेश महाराज त्रिपाठी उपस्थित होते. सुरुवातील मान्यवरांच्या हस्ते व्ही. रवीकुमार अय्यर लिखित इंडोनेशियाचे पुनरुत्थान या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

व्ही. रवीकुमार अय्यर पुढे म्हणाले की, ज्यावेळी समाज बदलतो त्यावेळी त्याठिकाणी असलेली राजनीती बदलून त्यांचा सन्मान बदलून त्याचा परिणाम हा देशावर होत असतो. सौदी अरेबियातील रहिवाशांनी हिंदूत्वातील संस्कृतीचा स्वीकार केल्यानंतर त्याठिकाणी मोठ्या गतीने बदल होत आहे. त्याठिकाणी पूर्वी महिला नोकरी करू शकत नव्हत्या त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हते. परंतु आता त्याठिकाणच्या महिलांना हे स्वातंत्र्य मिळाले आहे. गेल्या चौदाशे वर्षात ज्या देशात बदल झालेला नाही त्याठिकाणी आता हिंदुत्वाच्या धोरणांमुळे बदल होत आहे. 

इस्कॉनतर्फे धर्मप्रसार
इस्कॉनतर्फे संपूर्ण जगभरात हिंदू धर्माचा प्रसार केला जात आहे. अनेक देशांमध्ये इस्कॉनने मंदिरे बांधली असून त्याठिकाणी धर्माचा प्रचार प्रचंड वेगाने होत आहे. रशियात हरेराम हरे कृष्णाच्या माध्यमातून देखील धर्माचा प्रसार होत आहे.

हिंदू धर्म नव्हे, संस्कृती - ॲड. पाटील
प्रमुख अतिथी ॲड. प्रकाश पाटील बोलताना म्हणाले की, ज्यावेळी मी हिंदुत्वाचा विचार करतो त्यावेळी हा धर्म नसून ही संस्कृती आहे. हा फरक प्रत्येकाने लक्षात घेतला पाहिजे. पूर्वी हिंदूत्वाचा प्रचार मोठ्या प्रमाणात केला जायचा परंतु आता प्रचार करणे शक्‍य नाही. ज्यावेळी आपण धर्माचा विचार करतो त्यावेळी त्याच्या मूलभूत बाबींचा देखील विचार केला पाहिजे.

अयोध्येत राम मंदिर केव्हा?
जगातील इतर देशांमध्ये हिंदू धर्माची मंदिरे बांधली जात आहे. इंडोनेशिया इस्लामिक राष्ट्रात मंदिर बांधले जात आहे. परंतु भारतात अयोध्येत राम मंदिर केव्हा होईल हे सांगू शकत नाही. इतिहासाच्या अज्ञानामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. येणाऱ्या काळात बदल करण्याची आपल्यात ताकद असली पाहिजे असल्याचे श्री. अय्यर यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com