गिरणाचे आवर्तन उद्या सकाळी सहाला सुटणार

गिरणाचे आवर्तन उद्या सकाळी सहाला सुटणार

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : जळगाव जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी टंचाई दूर करण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या आदेशान्वये आज जिल्हाधिकारी यांच्याकडील पत्रानुसार गिरणा धरणातून उद्या (ता.5) सोमवारी सकाळी सहा वाजता आवर्तन सोडण्यात येणार आहे. यामुळे गिरणाकाठच्या गावांसह भडगाव पाचोरा या गावांमध्ये पाणी टंचाई दुर होण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव चाळीसगाव ग्रामीण भागातील काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.सद्य:स्थितीत पाण्याचे स्त्रोत आटू लागले आहेत. नागरिकांना पाण्याच्या शोधार्थ भटकंती करावी लागत आहे. 

दरम्यान, दुष्काळी गावांची पहाणी करण्यासाठी आलेले जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाणी टंचाई निवारणार्थ तातडीने गिरणा धरणातून आवर्तन सोडण्यात येईल असे आश्वासन दिले होते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आमदार उन्मेष पाटील यांनीदेखील पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज जिल्हाधिकारी यांच्याकडील आदेशानुसार उद्या (ता.5 सोमवार)सकाळी सहाला गिरणा  धरणातून 2  हजार 500 क्यूसेक एवढे आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती गिरणाचे उपअभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे यांनी ' सकाळ'ला दिली.

सोडण्यात आलेले हे आवर्तन पिण्यासाठीच असल्याने त्याचा शेतीसाठी वापर करू नये, आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे शाखा अभियंता एस. आर. पाटील यांनी सांगितले. गिरणातून आवर्तन सुटणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com