खेडी पाणी पुरवठा योजना तातडीने सुरू करण्याची मागणी

manmad
manmad

मनमाड - गेल्या दोन महिन्यापासून बंद असलेली  नांदगाव-चांदवड तालुक्यातील ४२ खेडी पाणी पुरवठा योजना शासनाने तातडीने सुरू करण्याची मागणी ४२ खेड्यातील सरपंचांनी केली. अन्यथा योजनेस पाणी पुरवठा करणाऱ्या नाग्यासाक्या धरणात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा पाणी पुरवठा समितीने बैठकीत दिला. शासकीय निधी मिळत नसल्याने योजना अडचणीत आली असून 'योजना असून घात नसून खोळंबा' अशी स्थिती झाली आहे  

येथील शासकीय विश्राम गृहावर नांदगाव-चांदवड तालुका बीडीओ, सभापती, ग्रामसेवक, मजीप्रा तसेच ४२ खेड्यांच्या सरपंचांची पाणी योजना समितीची बैठक झाली. नांदगाव व चांदवड तालुक्यात ४२ खेडी पाणी पुरवठा योजना २ महिन्यांपासून बंद आहे. यामध्ये नांदगाव तालुक्यातील २४ तर चांदवड तालुक्यातील १६ गावांचा समावेश आहे. योजनेचे वीज वितरण कंपनीचे १८ लाख रुपयांचे बिल थकले असून ते भरले नसल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. पाणी पुरवठा बंद असल्याने ४२ खेड्यातील ७५ हजार ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. अनेक गावांत यंदा पावसाळा कमी झाल्याने मोठी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. योजना सुरू करण्यात यावी यासाठी बैठक झाली. 

योजनेचा खर्च १ कोटी ७६ लाख रु इतका असून गावांची पाणीपट्टी वसुली केवळ ६० लाख रु आहे. यातील रक्कमेची मोठी तफावत असल्याने योजना अडचणीत सापडून बंद पडली आहे. तर शासन या योजनेला वाढीव निधी द्यायला तयार नाही. तफावतीच्या कचाट्यात योजना सापडल्याने ४२ खेड्यांची सरपंच समिती हवालदिल झाली आहे सध्या प्यायला पाणी नाही तर शासकीय अधिकारी बैठका घेण्यापलीकडे पुढे सरकत नाही पावसाळा कमी झाल्याने ४२ खेड्यांतील लोकांसह जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे या रक्कमेतील तफावत मधील रक्कम शासनाकडून मागण्याऐवजी अधिकारी दुष्काळातही पाणीपट्टी वाढविण्यास अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे तर वीज वितरण कंपनी विजेचे दर कमी करायला तयार नाही ज्या गावात योजना कार्यान्वित आहे अशा गावांना टँकर दिले जात नसतांनाही टँकर लॉबी सक्रिय होत असल्याचा आरोप केला गेला. योजनेवर दीड कोटी खर्च केले तर शासनाचे ४२ खेड्यातील टँकरवर होणारे १५ कोटी रुपये वाचणार आहे. मात्र योजनेकडे लक्ष दिले जात नाही टँकरची प्रस्ताव तयार केला जात आहे नाग्यासाक्या धरणात पाणी असतांनाही ४२खेडे पाण्यावाचून तळमळत आहे योजना असून घात नसून खोळंबा अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे शासनाने लक्ष देऊन योजना सुरू करावी अशी मागणी केली अन्यथा ४२ खेड्यांचे सरपंच, ग्रामस्थ योजनेस पाणी पुरवठा करणाऱ्या नाग्यासाक्या धरणात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा समितीचे अध्यक्ष तथा नांदगांव तालुक्यातील लक्ष्मिनगरचे सरपंच बापु जाधव, उपाध्यक्ष तथा चांदवड तालुक्यातील दरेगांवचे सरपंच अमोल देवरे यांनी यावेळी दिला. 

दुष्काळामुळे योजनेतील ४२ खेडे पाण्यासाठी तळमळत आहे. शासन निधी द्यायला तयार नाही पाणी कुठून आणावे असा प्रश्न ४२ सरपंचांना पडला आहे शासनाने तातडीने योजना सुरू न केल्यास नाग्यासाक्या धरणात सर्व सरपंच, ग्रामस्थ जलसमाधी घेऊ. 
- बापु जाधव, अध्यक्ष ४२ खेडे पाणी पुरवठा योजना समिती 

पाऊस, पाणी नाही दुष्काळ पडला अशात ४२ खेडे पाणी योजना बंद आहे ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण भटकत आहे या खेड्यामध्ये १५ कोटीचे टँकर सुरू करण्याऐवजी दीड कोटी योजनेवर खर्च केल्यास ग्रामस्थांना पाणी मिळेल आणि शासनाचे पैसेही वाचतील
- अमोल देवरे, उपाध्यक्ष, ४२ खेडे पाणी पुरवठा योजना समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com