जळगाव ः जिल्ह्यात अवकाळी पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे आज अखेर 4 लाख 35 हजार 440 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण केले आहेत. लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्यासाठी कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली.
जिल्ह्यात 24 ऑक्टोबरपासून विविध ठिकाणी अधिक प्रमाणात पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांनी काढून ठेवलेले ज्वारी, मका पिकांचे नुकसान झाले. ज्याठिकाणी कापूस फुटला होता तो संततधार पावसाने पूर्णतः काळा पडला. यासोबतच अनेक पिकांचे नुकसान झाले. यामुळे शेतकरी नुकसानीच्या खाईत ओढला गेला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर दिवाळीत व नंतरही पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वांनाच दिवाळी साजरी करता आली नाही.
यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना खरिपाचे उत्पादन अधिक होईल अशी आशा होती. मात्र ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने आशेवर पाणी फिरले. कापूस शेतातच भिजल्याने बाजारात आणता आला नाही. यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर संक्रांत आली. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून एकरी पंचवीस हजारांची मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
तालुका निहाय झालेले पंचनामे
अमळनेर-- 26 हजार 444 हेक्टर
चोपडा--44 हजार 801
एरंडोल-14 हजार 045
धरणगाव-17 हजार 900
पारोळा--33 हजार 70
जळगाव--30 हजार 642
भुसावळ--17 हजार 650
बोदवड--6 हजार 348
यावल--20 हजार 607
रावेर--11 हजार 235
मुक्ताईनगर--20 हजार 536
भडगाव--23 हजार 948
चाळीसगाव--58 हजार 470
जामनेर--85 हजार 489
पाचोरा--24 हजार 249
एकूण--4 लाख 35 हजार 440
जिल्ह्यात कृषी सेवक, तलाठी संबंधित कर्मचारी शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात व्यस्त आहे. आतापर्यंत सुमारे साडेचार लाख हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. दहा नोव्हेंबरपर्यंत सर्व पंचनामे पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील.
-डॉ. नंदकुमार बेडसे, अप्पर जिल्हाधिकारी, जळगाव
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.