एकाच विहिरीवर २४ टॅंकर भरतांना नाकीनऊ

एकाच विहिरीवर २४ टॅंकर भरतांना नाकीनऊ

येवला - विहीर एक,पाणीभरण्यासाठी साधने दोन अन टँकर तब्बल २४..अशी विचित्र स्थिती असल्याने टॅंकर भरण्यासाठी चालकांना दिवसभर प्रतीक्षा करण्याची वेळ येत असून यामुळे गावोगावी टॅंकर वेळेत पोहोचत नसल्याचे चित्र आहे.यामुळे नागरिकाना पाण्याच्या शोधात टॅंकरची दिवस-दिवस वाट पाहण्याची वेळ येत आहे.

तालुक्यातील टंचाईची स्थिती गंभीर झाली असल्याने टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढती आहे.भर पावसाळ्यात अन आज थंडीच्या दिवसातही ही वेळ आली आहे.आजमितीला ३६ गावे व २६ वाड्यांना २४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरुच असून अजून दोन गावे प्रतीक्षेत आहे.

तालुक्याचे पर्जन्यमान ४८८ मिमी असून यंदा फक्त ६० टक्के पाऊस झाला आहे.यामुळे जलयुक्त शिवारासह सर्वच योजना अपयशी झाल्या असून पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ ७० वर गावात ग्रामस्थांवर आली आहे.सन 2015-16 तालुक्यात भयावह परिस्थिती होती.तेंव्हा 63 गावे आणि 45 वाड्यांना 33 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची परिस्थिती तालुक्याने अनुभवली आहे.यंदा तर जानेवारी १८ पासून सुरु झालेले टँकर सुरूच असून जून १९ पर्यंत चालणार आहे.

एकच विहीर आधार...
दिवसागणिक टॅंकरची संख्या वाढत आहे पण पाण्याचा उदभव नसल्याने केवळ शहर पाणी योजनेच्या साठवण तलावालगतच्या विहिरीवर हे टॅंकर भरले जात आहेत.येथे दोन विहिरी आहे पण धूत विहीरिजवळ नाल्यात पाणी आल्याने टॅंकर फसत आहेत.यामुळे एकाच विहिरीवर सध्या टॅंकर भरण्यासाठी अगदी नंबर लागत असल्याने गावोगावी टॅंकर वेळेत पोहोचत नसल्याचे चित्र आहे.

याठिकाणी प्रशासनाने दोन्ही विहिरीवर एकाचवेळी तीन-चार टॅंकर भरतील अशी व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.
येथे सुरू आहे टॅंकर...

३६ गावे - रहाडी,धामणगाव,कासारखेडे, शिवाजीनगर बाळापुर, कुसुमाडी, चांदगाव, खैरगव्हाण, जायदरे, आहेरवाडी, वाईबोथी, पिंपळखुटे तिसरे, कोळगाव, खिर्डीसाठे, लहित, गुजरखेडे, सोमठाणजोश, पांजरवाडी, अनकाई, राजापूर, वाघाळे, खरवंडी, आडसुरेगाव, कोळमबुदुक कोळम खुर्द, डोंगरगाव, कौटखेडे, नायगव्हाण, हडपसावरगाव, भुलेगाव, धनकवाडी, देवदरी, नीळखेडे, पन्हाळसाठे, गारखेडा, वसंतनगर २६ वाड्या - नगरसूल परिसरातील 12 वाड्या, राजापूर परिसरातील तीन वाड्या, भगतवस्ती (अनकाई ), बोराडे वस्ती(गोरखनगर), हनुमाननगर व (खिर्डीसाठे), अहिरेवस्ती (पिंपळखुटे खु), सायगाव येथील महादेववाडी, कुळधरवस्ती (सायगाव), ममदापूर परिसरातील दोन वस्त्या, देवदरी(दाणेवस्ती), 
खरवंडी(बावाचेवस्ती), तळवडे परिसर 4 वस्त्या. 

दरम्यान, तालुक्यातील अन्य ठिकाणावरूनही पाणी टँकरची मागणी पंचायत समितीकडे येत असून आणखी गावे वाढणार आहे.

"गावोगावी दिवसभराच्या वापरासह पिण्यासाठी पाणी मिळवणे कठीण झाले आहे. त्यात टॅंकरला उशिर झाला अन पाणी वेळेत न मिळाल्यास आख्य्या दिवसाचा प्रश्न भेडसावतो.त्यामुळे टॅंकर वेळेत भरण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात. "
रुपचंद भागवत, उपसभापती, प.स., येवला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com