छावणीतील जनावरांची संख्या वाढणार

Cow
Cow

नाशिक - गावांमध्ये छावण्या उघडण्यास परवानगी देण्यात येत असल्याने छावणीतील जनावरांची संख्या दीडशे करण्यास सरकारने मान्यता दिली. मात्र त्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

तसेच उस्मानाबाद, जालना, बीड, परभणी आणि औरंगाबादमधील सहा गोशाळांसाठी देण्यात आलेल्या १० कोटींपैकी साडेचार कोटी पशुसंवर्धन विभागाने सरकारला परत केले आहेत. त्यात आणखी भर घालून १८ कोटी १९ लाख सात जिल्ह्यांतील आठ छावण्यांसाठी सरकारने दिले.

उस्मानाबाद, बीड, जालना, परभणी, औरंगाबाद, नगर व हिंगोली जिल्ह्यातील छावण्यांना हा निधी मदत व पुनर्वसन विभागाने दिला आहे. छावणीतील एका मोठ्या जनावरासाठी दिवसाला ७०; तर छोट्या जनावरासाठी ३५ रुपये अनुदानापोटी मिळणार असून, यासाठी १३ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. उर्वरित ४ कोटी ८१ लाख चारा, पाणी, औषधांचा पुरवठा आणि वाहतूक खर्च म्हणून खर्च केले होणार आहेत. राज्यातील २६ जिल्ह्यांतील १५१ तालुक्‍यांत आणि या तालुक्‍यांव्यतिरिक्त २६८ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ व ५ हजार ४४९ गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती सरकारने जाहीर केली आहे.

दुष्काळग्रस्त भागात छावणी सुरू करण्यासाठी ३०० ते ५०० जनावरांची अट लागू करण्यात आली होती. त्यानंतर छावणीतील जनावरांची संख्या अडीचशेपर्यंत शिथिल करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com