चौदा वर्षांपासून कोरडे होते ओहोळ अन्‌ नाले..पण आता.....

NASHIK ODHA.jpg
NASHIK ODHA.jpg

नाशिक : ऑक्‍टोबरच्या शेवटी झालेल्या अवकाळी पावसाने खामखेडा परिसरातील तब्बल १४ वर्षांपासून कोरडेठाक ओहोळ व नाले वाहू लागले आहेत. त्यामुळे पुढील दोन वर्षे पाणीपातळीत घट होणार नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. गेल्या वर्षी प्रचंड दुष्काळ असल्याने यंदा जेमतेम असाच पाऊस होईल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. सुरवातीचे दोन महिने कोरडेठाक गेल्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पावसाने सरासरी साधल्यामुळे खामखेडा व परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली. 

अवकाळी पावसामुळे लागले ओहोळ- नद्या-नाले वाहू 
सुरवातीच्या पावसात परिसरातील धरणे, सिमेंट कॉंक्रिट बंधारे, माती नाला बांध भरून कोरडे झाले होते. मात्र, ऑक्‍टोबरच्या शेवटच्या टप्प्यात परतीच्या अवकाळी पावसाने परिसरातील पाण्याचे सर्व स्रोत पुन्हा भरल्याने परिसरातील पाणीपातळीत वाढ झाली आहे. ३० व ३१ ऑक्‍टोबरला झालेल्या जोरदार पावसाने खामखेडा परिसरातील सर्व प्रमुख ओहोळ व नाले मोठ्या प्रमाणावर वाहू लागले आहेत. अवकाळी पावसाने सर्वच स्रोत चार्ज झाल्याने नाले, ओहोळांमधून जिवंत पाणी वाहू लागल्याने परिसरातील शेतमळ्यांमधील शेतकऱ्यांच्या रस्त्यांची वाट लागली आहे. अनेक शेतकऱ्यांना जाण्या-येण्यासाठी, शेतमाल काढण्यासाठीही रस्ते नाहीत. परतीच्या जोरदार सलग पावसाने प्रत्येक शेतात पाणी असल्याने हे पाणी नाल्यांत उताराला जिवंत होत वाहत असल्याने ओहोळ, नाले भरून वाहत आहेत. नाल्यांमधील रस्ते खराब झाले असले तरी पाण्याचे संकट टळल्याने शेतकरी मात्र समाधानी आहेत. 

प्रतिक्रिया
खामखेडा व परिसरातील नाले पंधरा वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून कोरडेठाक होते. मात्र, यंदा अवकाळी पावसामुळे नाले पुन्हा वाहू लागले आहेत. परिसरातील सर्वच रस्ते खराब झाले आहेत. - बाळू मोरे, शेतकरी, खामखेडा  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com