बदलत्या जीवनशैलीने अकाली टक्कल

Hairfall
Hairfall

नाशिक - बदलत्या जीवनशैलीचा लोकांच्या केसांवर परिणाम जाणवत असून, अकाली टक्कल पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्वचारोग तज्ज्ञांच्या ‘स्किन अँड कॉस्मेटिक्‍स जर्नल’मध्ये याबाबत माहिती आली असून, त्यातील अहवालानुसार दर १० जणांमागे ६.७ जणांमध्ये केसगळती होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे केसगळती ही आता सार्वत्रिक समस्या 
बनली आहे. 

धकाधकीच्या जीवनात अवेळी झोप अन्‌ अवेळी जेवण, खाण्यात जंकफूडचे प्रमाण अधिक यामुळे केसगळती होत असल्याचे जागतिक पाहणीत दिसून आले आहे. यात उपायांपेक्षा अपायांनाच अधिक निमंत्रण दिले जात असल्याचाही प्रकार दिसून आला आहे. त्यात गैरसमजुतीच अधिक असल्याचे प्रामुख्याने पाहणीत आढळून आले आहे.

उपाय
    कोंडा असेल तर तेल लावू नये
    अँटीडॅन्ड्रफ शाम्पू वापरावा
    ब्लोड्राय, हेअर स्पा आदी प्रयोग करू नये (वैद्यकीय सल्ला आवश्‍यक)
    ओले केस नैसर्गिकरीत्या कोरडे होऊ द्यावे
    केसांना साजेसा (सूट होईल) असा शाम्पू व कंडिशनर वापरावा
    केस गळतीसाठी वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार आवश्‍यक
    पोषक द्रव्ये असणाऱ्या औषधांचा सेवनाने केस गळतीवर नियंत्रण
    केसगळती ते नवीन केसांची वाढ, यात ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागतो. याकरिता घाईचा उपचार करू नये. 

योग्य दैनंदिनी, सकस आहार, फळ, हिरव्या पालेभाज्या, सॅलेड, प्रथिनांचा आहारात योग्य वापर केल्यास केसांचेच नव्हे, त्वचेचेदेखील सौंदर्य खुलते. 
- डॉ. सचिन येवले, त्वचा व कॉस्मेटिक सर्जन, नाशिक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com